* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AMBIGUOUS LOSS
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980608
  • Edition : 1
  • Publishing Year : 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROZEN SADNESS THIS IS WHAT WE HAVE WHEN WE CANNOT REALLY KNOW WHAT WE HAVE LOST. AND THIS IS WHAT PAULINE BOSS ILLUMINATES, AND HELPS TO EASE, IN AMBIGUOUS LOSS, AN ORIGINAL AND HUMANE ACCOUNT OF THE RAVAGES OF UNCERTAINTY FACED WHEN WE LOSS A LOVED ONE THROUGH DIVORCE, ADOPTION, ADDICTION, CHRONIC MENTAL ILLNESS, IMMIGRATION, OR ALZHEIMER’S. WITH SENSITIVITY AND LUCIDIRY, BOSS EXPLORES THE RUMULRUOUS EMOTIONS STIRRED UP BY SUCH LOSSES, ESPECIALLY THE WIDE FLUSTUATION BETWEEN HOPE AND HOPELESSNESS. DRAWING ON HER RESEARCH AND CLINICAL EXPERIENCE, BOSS SUGGESTS STRATEGIES THAT CAN CUSHION THE PAIN AND OFFERS HEARTENING NARRATIVES OF THOSE WHO COPE WITH AMBIGUOUS LOSSES AND MANAGE TO MOVE ON. “A COMPASSIONATE EXPLOTATION OF THE EFFECTS OF AMBIGUOUS LOSS AND HOW THOSE EXPERIENCING IT HANDLE THIS MOST DEVAS TATING OF LOSSES... BOSS’S APPROACH IS TO ENCOURAGE FAMILIES TO TALK TOGETHER, TO REACH A CONSENSUS ABOUT HOW TO MOURN THAT WHICH HAS BEEN LOST AND HOW TO CELEBRATE THAT WHICH REMAINS. HER SIMPLE STORIES OF FAMILIES DOING JUST THAT CONTAIN LESSONS FOR ALL. INSIGHTFUL. PRACTICAL, AND REFRESHINGLY FREE OF PSYCHOBABBLE.’’ KIRKUS REVICTUS “COMBINING HER TALENTA AS A COMPASSIONATE FAMILY THERAPIST AND A CREATIVE RESEARCHER, PAULINE BOSS ELOQUENTLY SHOWS THE MANY AND COMPLEX WAYS THAT PEOPLE CAN COPE WITH THE INEVITABLE LOSSES IN CONTEMPORARY FAMILY LIFE. A WISE BOOK, AND CERTAIN TO BECOME A CLASSIC.’’ CONSTANCE R. AHRONS, AUTHOR OF THE GOOD DIVORCE PAULINE BOSS IS PROFESSOR OF FAMILY SOCIAL AT THE UNIVERSITY OF MINNESOTA, PAST PRESIDENT OF THE NATIONAL COUNCIL ON FAMILY RELATIONS, AND A PSYCHOTHERAPIST IN PRIVATE PRACTICE.
जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बNयाच किमती मोजून झालेल्या असतात! अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक. ‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो. आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AMBIGUOUSLOSS #AMBIGUOUSLOSS #अँबिग्युअसलॉस #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #DR.PAULINEBOSS
Customer Reviews
  • Rating Starसौ. शारदाताई दाते

    कालच आपले `अँबिग्युअस लॉस` हे अनुवादित पुस्तक वाचनात आले. खूप आवडले. एवढेच नव्हे तर मनाला एक वेगळेपण जाणवले. आपण खूप सुंदर अनुवाद केलेला आहे. मानवी मनाची रचना आणि जीवनातले भलेबुरे अनुभव जगभरातल्या माणसांच्या बाबतीत सारखेच असतात. माणसांची नावे बदलती, गावे बदलतील, विचार बदलतील, संस्कार बदलतील, पण येणारे भलेबुरे अनुभव सारखेच असतील. मानवी मनाची रचना ही खरोखरीच एकसारखी असते. मला हे अगदी तंतोतंत पटले. कोठेही जा पळसाला पाने तीन असे म्हणतात ते खरेच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GOADOOT 7-2-2010

    वर्षांनुवर्षे कुरतडत राहणारी आठवण, जीव जाळत राहणाऱ्या मानसिक व्यथा, दूरदेशी गेलेल्यांच्या आठवणी, जीवघेण्या आजारामुळे डोळ्यांसमोर दिसत असूनही वास्तवात हरवलेली नाती... अशा सर्व गोष्टींचा या यातना भोगणाऱ्या व्यक्तींवर कळत न कळत परिणाम होत असतो. वरवर सुवयवस्थित चाललेले जीवन कमतरतेच्या जाणिवेने पोखरत जाण्याची भावना त्या व्यक्तींमध्ये आढळते. तिचा केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे तर कुटुंबातील इतर व्यक्तींवरही परिणाम होत राहतो. ते कुटुंब जर त्यातून सावरले नाही तर कुटुंब उद्धवस्तेकडे झुकते. कौटुंबिक सल्लागाराचे काम करणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांना त्यांच्या बालपणापासूनच या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांची आजी मूळची स्वित्झर्लंडमधली. नवऱ्याबरोबर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली. दशके लोटली तरी तिचे मन मायदेश आणि माहेरच्या नातेवाईकांपासून सुटू शकले नाही. घरच्या गरिबीमुळे एकदाही परत स्वित्झर्लंडला तिला जाता आले नाही. जन्मभर मुलांबाळात व संसारात राहूनही ती त्यात नसल्यासारखी होती. लेखिकेच्या आईला बालपणापासून स्वतःच्या विश्वात हरविलेल्या व मातृसुख देऊ न शकणाऱ्या आईला व नंतर झालेल्या भावंडांना सांभाळून घ्यावे लागले. स्वतःच्या घरातच अशा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संदिग्धतेच्या फेऱ्यात अडकलेल्या आजीच्या अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या लेखिकेने आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नाचा अभ्यास करण्यास वाहून घेतले. या पुस्तकात वाहून गेलेल्या तीन मुलांच्या आठवणीने व्यावूâळ होऊन ४० वर्षांनंतर त्यांना परतीची हाक देणाऱ्या जोडप्याची व्यथा आहे. कायदा झुगारून रस्त्यावर उतरलेल्या व्हिएतनाममध्ये लुप्त झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या बायका आहेत, अलझायमर होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व हरविलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या व्यथा आहेत, घटस्फोट झाल्यानंतरही सोडून गेलेल्या नवऱयांची घरगुती प्रश्नांमध्ये आधार घेणाऱ्या महिला आहेत. घटस्फोट व पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या मानसिक कुतरओढीच्या समस्या आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीतून एकाएकी वेगळ्या, छोट्या स्वकेंद्रित कुटुंब व्यवस्थेत गेलेल्यांच्या व्यथा आहेत. जीवनमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य मनोभूमिका स्वीकारण्याचे मार्गदर्शनही या पुस्तकात मिळते. दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अमेरिकेतील आदिवासी विशेषतः महिला या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना अधिक सकारात्मक मनोभूमिकेतून सामोरे जाताना दिसतात. ती ताकद खिश्चन कुटुंबात कमी दिसते. भारतातही यापुढे अशा द्विधा मनःस्थितीत असणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. त्यात दिलेली उत्तरे व मानसिक भूमिका आपल्या समाजालाही लागू होतील. ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 15-3-2010

    न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण ‘अँबिग्युअस लॉस’ असं या पुस्तकावर लिहिलंय. खऱ्या अर्थाने वाचकांना दु:ख घेऊन जगायचं कसं हे या पुस्तकातून कळतं. संशोधक म्हणून नावलौकिक असणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद. त्यांनी अनिश्चित दु: घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड, चायनीज, तैवान, चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत याचा अनुवाद करून मराठी वाचकांपर्यंत ही शिकवण पोहोचवली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरले आहे. काही शब्दांचे अर्थ वाचकांना उमजले नाहीत, तर त्याचे अर्थ सांगणाऱ्या टिपा शेवटच्या पानावर देण्यात आल्या आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 15-11-2009

    न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण देणारं पुस्तक म्हणून ‘अँबिग्युअस लॉस’चा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. पॉलिन बॉस यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमपूरकर यांनी केला आहे. छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणाऱ्या, नकळत होणाऱ्या, कितीकाळ भोगावं लागणार तेही नक्की नसणाऱ्या, अटळ अशा दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षे संशोधन, अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘अँबिग्युअस लॉस’चा शोध. या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढ्याच सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ‘अँबिग्युइटी’ म्हणजे अनिश्चितता आणि लॉस म्हणजे काही तरी गमवाणं. अँबिग्युअस लॉस’ या नावामध्ये ती सहजपणे एकमेकांमध्ये मिसळली आहे. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा अँबिग्युअस लॉस अनुभवावा लागतो. त्यावेळी काही तरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत राहतं. तसं झालं नाही तर हे विचित्र, धूसर, उलगडा न झालेलं नुकसान, हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करुन सोडतो. आपल्या परीने शोधताना प्रत्येकाची उत्तरं वेगळीच असतात. पण अँबिग्युअस लॉस पुस्तक वाचल्यानंतर येणारं उत्तरंही प्रश्नांपेक्षा सोपी वाटतात. हेच या पुस्तकाचं यश म्हणता येईल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more