* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADNYATACHE VIDNYAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662474
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. NADKARNI IS A MULTIDIMENSIONAL VERSATILE PERSONALITY. HE HAS A COMMAND OVER LITERATURE, MUSIC, ART, SCIENCE, SPORTS, AND POETRY. HE IS A PERFECT COMBINATION OF DILIGENCE AND DISCERNMENT.HIS WRITING REVEALS ALL HIS PECULIARITIES MAKING IT UNIQUE. HE SEARCHES THE HORIZONS IN THE FIELDS OF MUSIC TO SCIENCE ENTERTAINING AND CAPTURING THE MINDS OF THE READERS.THE PRESENT BOOK IS YET ANOTHER OF HIS ASTONISHINGLY WONDERFUL CREATION.
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक बहुवेधी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, शेर-शायरी अशा विविध क्षेत्रांमध्ये अधिकारवाणीनं संचार करणारं. व्यासंग आणि रसिकता यांचा सुरेच मेळ असलेलं. म्हणूनच कमालीचं वैविध्यपूर्ण आणि रसरशीत शैलीनं नटलेलं असं लेखन हे त्याचं वैशिष्ट्य ठरतं. संगीताच्या मैफलीपासून गूढगुंजनाचा शोध घेणा-या विज्ञानापर्यंत अनेक विषयांचा रसग्राहक, शोधक मागोवा ते घेतात; आणि वाचकाला आपल्याबरोबर रमणीय विश्वात रमवतात... "अज्ञाताचे विज्ञान" ही आहे त्यांने घडविलेली अशीच एक आगळीवेगळी सफर....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNYATACHEVIDNYAN #ADNYATACHEVIDNYAN #अज्ञाताचेविज्ञान #SCIENCE #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्र नाडकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDaulati Vairat

    दोनदा वाचले आहे. छान आहे.

  • Rating StarAnil Soman

    मध्यंतरी fb वर `पृथ्वीवर माणूस उपराच` हया पुस्तकावर पोस्ट आली होती. त्या संदर्भात डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांचे माझ्या संग्रही असलेले `अज्ञाताचे विज्ञान` हे पुस्तक आठवले. डॉ.नाडकर्णी म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व. साहित्य, संगीत, शेरो शायरी आशा विवध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे. आपल्या अवती भोवती निसर्गात अशा अनेक घटना घडत असतात की त्या मागची कारण मीमांसा आपल्याला समजू शकत नाही. हे असे कसे व का ह्याची उत्तरे सापडत नाहीत. अनेक घटना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आणि मग साहजिकच त्यांना गुढतेचे वलय प्राप्त होते. प्रस्तुत पुस्तकात ह्याच अज्ञात वाटणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न ह्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. जाणीव म्हणजे काय, तेजोवलय कोष, दूर संवेदना ई. कांही लेखांची शीर्षके आहेत. लेखकाने अनेक संदर्भही दिले आहेत. पुस्तक छान माहितीपूर्ण आहे. लेखकाची शैलीही उत्कंठा वाढविणारी आहे. वेगळ्या विषयाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते... आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे. अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे. डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य. ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते. पस्तीस आणि चाळीस सेल्सियस तापमानाच्या दरम्यान पाणी अत्यंत अस्थिर वागते. माणसाच्या शरीराचे तापमान नेमके याच तापमानाच्या टप्प्यात असते. हा केवळ योगायोग मानायचा का? (७) पृथ्वीवर सापडणाऱ्या सुमारे ११० मूलद्रव्यांपैकी फक्त सोळा द्रव्येच सजीवांचे शरीर घडवितात. त्यांच्या क्रमवारीचे संयुग साखळ्या (कंपाउंड चेन्स) बनविल्या जातात. बुरशीपासून देवमाशापर्यंत सर्वांच्या बाबतीत हाच प्रकार होतो. (९) विशिष्ट क्रमवार मांडणीने होणारी सजीवांची निर्मिती हा एक चमत्कारच आहे. मांजराचे कान इतके तीक्ष्ण असतात की त्यांचे वर्णन हाय फिडेलिटी इक्विपमेंट असे करता येईल. (११) डॉ. सेमिअन किर्लेअन यांनी मानवी शरीराभोवती असणाऱ्या तेजोवलय कोषाचा फोटो घेणारे तंत्र विकसित केले. (८९) हाताच्या पृष्ठभागावरचे किरणांचे पुंज या यंत्राद्वारे दिसल्यावर डॉ. मिखाईल गायकिन यांना अ‍ॅक्युपंक्चरच्या उपचारबिंदूच्या नकाशाशी ते जुळतात असे आढळून आले. (९०) चरक व सुश्रुत यांनी मानवी शरीरावरील १०७ मर्मबिंदूंची नोंद केलेली आहे. (९१) टोबिस्कोप या यंत्रामुळे बायोप्लाझ्मा (सूक्ष्मदेह), तेजोवलय (ऑॅरा) आणि अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू या उपचार पद्धतीत एक नवीनच दुवा निर्माण झाला आहे. (९२) सूक्ष्मदेह व तेजोवलय दोहोंना जोडणारे मन शरीरात कुठे आहे? अंतर्मनात अनेक सुप्त भावना दाबून ठेवल्या जातात. कारणपरत्वे त्यांचा एकाएकी उद्रेक होतो, तेव्हा मनोगतिकीच्या घटना घडून येतात. त्यांना भानामती असे मानले जात असावे असे डॉ. नांदोर फॉडोर हे मनोविश्र्लेषणतज्ज्ञ मानतात. (९५) डॉ. जेनेडी सर्जेयेव्ह यांनी म्हटले आहे की अत्यंत गाढ झोपेत वा समाधी अवस्थेत मेंदूतून प्रतिसेकंद चार लयीत ह्रदयाचे ठोके स्पंदन पावत असतात. त्यांना थिटा लहरी म्हणतात. (९६) जपानमध्ये १९१०-१९१३ या अवधीत टोमाकिशी फुकुराई याने सीलबंद फोटोप्लेटवर आपल्या मनातील विचारांचे छायाचित्र उमटवून दाखविण्याचा प्रयोग केला. (९८) निरनिराळ्या भाषांतील शब्दोच्चारणाची पद्धत व त्यातून निर्माण होणारे ध्वनी लक्षात घेऊन जागतिक ध्वन्यानुसारी (फोनेटिक) वर्णमाला तयार करण्यात आली. (५६) विश्वातील सर्व अणू हे कंपनशील आहेत आणि एखाद्या गोलाकार घंटेप्रमाणे सतत नादनिर्मिती करीत असतात. परमाणू हे स्वरसमूह आहेत. सजीवांचे शरीर हे एक वाद्य आहे. त्यातून सतत संगीत बाहेर पडत असते. ‘सिंफोनी ऑफ लाइफ’ या ग्रंथात डॉ. डोनाल्ड अँड्र्यू यांनी ही कल्पना मांडली आहे. (५७) दूर अंतरावरून, स्पर्श न करता दिवा पेटवता येतो हा प्रयोग १९३०-३१ साली डॉ. हॅरी प्राइस यांनी मार्गारेट एलिन या महिलेबाबत करून दाखवला. (६७) नेलिया मिखाइलोव्हा या महिलेने स्लाइसच्या चळतीकडे रोखून पाहिले. त्यातील एक स्लाइस बाहेर पडून नेलियाच्या दिशेने सरकत गेली - ही रशियातील साहित्यिक लेव्ह कोलोनी आणि व्हादिन मरीन यांनी नोंदवलेली कहाणी. (७५) नेलियाचे विद्युत चुंबकीय क्षेत्र इतरापेक्षा अधिक शक्तिशाली होते. केवळ नजरेने अंड्याचा पांढरा व पिवळा भाग अलग केला. (७७) लहान मेंदूच्या खालील भागात कल्पिलेले आज्ञाचक्र (थॅलॅमाय) हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असन कुंडलिनी जागृती करणारे साधक त्याला शिवाचे स्थान मानतात. (७७) प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे एक स्थितिज विद्युत क्षेत्र (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते. गूढ विद्यासाधक हे तेजोवलय कोष पाहू शकतात वा तसा दावा करतात. (८३) डॉ. ऑस्कर बॅग्नल आणि डॉ. वॉल्टर क्लिनर यांनी त्यावर प्रयोग केले. (८४) शरीरातील सर्वात महत्त्वाची चेतासंस्था दिवसाकाठी तीन ग्रॅम पोटॅशियम उपयोगात आणते. आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतही हेच प्रमाण आढळते. यावरून पृथ्वीचे दिनमानचक्र आणि मानवी शरीराच्या क्रिया यांचा संबंध लक्षात येतो. (१३) पहाटे चार वाजता मातेचे शरीर कमाल शिथिल अवस्थेत असते. त्याच वेळेस जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण जास्त आढळते. पहाटे शरीर क्रिया मंदावलेल्या असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस ही वेळ निवडतात. सर्वाधिक मतिमंद मुले डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जन्मलेली दिसतात. मे-जून मध्ये जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आढळतो. डॉ. हॅटिंग्टन व डॉ. हेन्री नॉब्लॉक यांचे संशोधन. (१४) शुक्ल पक्षात चंद्रकला वाढताना व पौर्णिमेला केलेल्या शस्त्रक्रियांच्या वेळी हजारपैकी ८७० रुग्णांना रक्तस्राव जास्त होतो. (१९) अमावास्येच्या आसपास केलेल्या शस्त्रक्रियांत अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो म्हणून ते दिवस शस्त्रक्रियांसाठी वापरावे असे डॉ. एडसन अँड्र्यू यांचे मत आहे. (२०) चोरी, उचलेगिरी, आततायी बेदरकार ड्रायव्हिंग, अतिरिक्त नशापान, इ. गुन्हे पौर्णिमेच्या दिवशी अधिक घड़तात, असे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेटॉलॉजीच्या अहवालात दिले आहे. (२०) जन्मलग्नी शनि-मंगळाशी निगडित असलेल्या व्यक्ती वैद्यकीय व्यवसायात जास्त आढळतात असा डॉ. मायकेल गॉकिलिन यांनी निष्कर्ष नोंदवला आहे. (२६) कर्करोग होण्यापूर्वी शरीराच्या अवयवांच्या विद्युतभारात लक्षणीय बदल घडून येतात असे डॉ. हॅरॉल्ड बर (येल युनिव्हर्सिटी) यांनी जाहीर केले. (३९) संपूर्ण शरीरात एकदिश विद्युत प्रवाह आहे. मात्र चेतासंस्थेतून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी वेगळ्या आहेत. सजीवाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र हे एकात्मीभूत कार्यतंत्र आहे आणि सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर देखील ते काही काळ मागे उरते असे डॉ. एडवर्ड रसेल यांना आढळून आले. (४१) ‘नियतीची संकल्पना’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे तर आत्मा नव्हे ना? पिरॅमिडच्या विशिष्ट रचनेमुळे खाद्यपदार्थ काही काळ तसेच टिकून राहतात. पिरॅमिडच्या आत ठेवलेली विद्युत उपकरणे कोणताही बिघाड न होता बंद पडतात असे डॉ. अमर गोहेड यांना आढळून आले. (५१) गोल, चौकोनी व दंडगोलाकृती डब्यापेक्षा मधे फुगीर असणाऱ्या पिंपात दारू वा बीअर स्वादिष्ट बनते. (५१) बुरशीसारखे सूक्ष्म जीवजंतू व मानवासारखा विकसित गुंतागुंतीचा देह यांच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस एकाच पद्धतीने निर्माण होतात. निसर्गात आढळणाऱ्या विविध आकृतिबंधांच्या शास्त्राला ‘सायमॅटिक्स’ हे नाव आहे. (५४) कंपनलहरी व त्यांच्या प्रभावामुळे घडवली जाणारी आकृती यांतील कार्यकारणभाव लक्षात घेऊन डॉ. हान्स येनी चांनी टोनोस्कोप हे यंत्र बनवले. ध्वनिलहरींची त्रिमिती आकृती रेखाटणारे हे साधन आहे. (५५) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more