* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ABHAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669305
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 1961
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE SKY THE NAME SHANKAR PATIL IS NOW WELL RECOGNIZED IN THE WORLD OF MARATHI LITERATURE. HIS SAVOUR DIALOGUES AND LANGUAGE WITH ITS RURAL TOUCH BINDS TOGETHER PERFECTLY WELL GIVING IT A DEFINITE TOUCH AND FRESHNESS. HE VERY APTLY COMBINES THE VARIOUS CHANGES IN THE NATURE, THE SOCIAL CHANGES AND THE COMBINED EFFECT OF IT ON THE RURAL LIFE AND CULTURE, IN HIS STORIES. MEMORIES ARE LIKE THE CLOUDS, FULL OF RAINS, READY TO POUR ANYTIME, ENDLESSLY. SOMETIMES, THEY POUR LIGHTLY AND SOMETIMES VERY STRONGLY. BUT THE MEMORIES HAVE THE STRENGTH TO EVOKE THE DEEPEST CORDS, TENDEREST MOMENTS. THE MEANINGS OF MEMORIES CHANGE FROM PERSON TO PERSON YET THEY FILL THE MIND WITH THE RESONANCE OF THE MONOTONOUS RAIN AND THE CLOUDY MIND MERGES INTO THE CLOUDY SKY.
शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NICHARA#HISHEB#KAVALA#VAVTAL#SOBAT#VATANI#KONDI#AABHAL#ARDHALI#JEET#VANGAN#PANGAL#VATCHAL
Customer Reviews
  • Rating StarAmir Bagwan

    मातीचा गंध असलेला लेखक शंकर पाटील प्रतेक पान वाचताना जानवत ते शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संसकृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात. ...Read more

  • Rating StarAniket Wadwale

    शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी! त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. यांच्या कथेनिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे. गुंतागुंत आहे त्यांची कथा चिंतनाच्या डोळ्यातूनच जन्मते. कथेद्वारेपरंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं ,त्यांच्यातील परस्परसंबंध,आणि खेड्यांचे मन हे त्यांच्या कथांचे विषय आहे. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलेले आहे. ग्रामीण जीवन,ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदलल आहे हे जाणीव त्यांनी मांडली...... कधी ते जुन्या नव्यातील पडलेल्या अंतर समजून घेतील, तर कधी आजूबाजूच्या माणसाशी गप्पा मारत बसतील.आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अश्या वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस........ चार पाऊले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा..... असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करायला लावणारे शंकर पाटील.... शंकर पाटील हे नाव मराठी वाचकांच्या मनात एक स्थान मिळवून आहे.त्यांची चटपटीत संवाद आणि गावरान भाषेचा बाज हा प्रत्येक वेळेस नवीन प्रकारे आपल्या अनुभवास मिळतो. निसर्गातले विविध बदल,सामाजिक परवर्तन ह्याचा ग्रामीण संस्कृती होणार परिणाम ते आपल्या कथांमधून मांडतात.. शंकर पाटील म्हणतात की, आठवण या भरून आलेलया आभाळा सारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा धुवाधार पाऊस असो माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो.पावसाची एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मन भरून आलेले आभाळात दाहीदिशा लुप्त होतात.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more