* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE IS A BOOK THAT COMPRISES 23 SHORT STORIES THAT ARE BASED ON THE PERSONAL EVENTS IN THE LIFE OF MURTHY. ONE OF THE STORIES IS ABOUT CHITRA, WHOSE STORY IS HIGHLY INSPIRING. THIS BOOK EXPLAINS HOW CHITRA’S LIFE WAS COMPLETELY TRANSFORMED AFTER MEETING MURTHY DURING A TRAIN JOURNEY FROM MUMBAI TO BANGALORE. CHITRA HAD GOTTEN ONTO THE TRAIN WITHOUT A TICKET, BUT THE AUTHOR TOOK HER IN AND PROVIDED HER WITH SHELTER. CHITRA STUDIES AND LATER MOVES ABROAD AND IS VERY APPRECIATIVE OF MURTHY’S GESTURE. IN ANOTHER STORY, THE READERS ARE INTRODUCED TO VISHNU, WHO IS A HIGHLY SUCCESSFUL MAN, YET HE DOESN’T KNOW WHAT IT FEELS LIKE TO BE HAPPY. IN ANOTHER STORY, ENTITLED GANGA’S GHAT, THE READERS ARE INTRODUCED TO AN OLD LADY, WHO DESIRES TO ACHIEVE SOMETHING IN LIFE. SHE EXPERIENCES CONTENTMENT AS A RESULT OF SEEING TO THE NEEDS OF HER FELLOW VILLAGERS BY SETTING UP A BATHING FACILITY. THE STORY CHANGING INDIA REVOLVES AROUND THE AUTHOR’S EXPERIENCES IN AMERICA, HEARING TWO DIFFERENT OPINIONS ABOUT THE COUNTRY. ONE OF THE STORIES IN THIS BOOK REVOLVES AROUND VENKAT, WHO DOESN’T HEED TO OTHER PEOPLE’S ADVICE, BUT ONLY SPEAKS. IN THE COVER STORY OF THIS BOOK, THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE, THE READERS ARE INTRODUCED TO A FAMILY RESIDING IN ODISHA, WITH WHOM THE AUTHOR HAD ONCE STAYED DURING HER VISIT TO THE VILLAGE. AS THE AUTHOR IS A GUEST TO THE FAMILY, THEY DESIRED TO GIVE HER SOME FOOD OR DRINK. THE AUTHOR ASKS FOR A GLASS OF MILK, AT WHICH THEY WERE COMPLETELY FLUSTERED AND UNABLE TO MEET HER REQUEST. THIS BOOK ALSO CONTAINS A HEARTWARMING STORY OF THE LIFE OF A MUSLIM NAMED RAHMAN, WHO WAS BROUGHT UP BY HIS HINDU NEIGHBOUR. THE STORIES IN THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE ARE SIMPLE AND MOVE THE HEART OF THE READER, HELPING THEM TO REALIZE HOW BLESSED THEY ARE.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटनाप्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक. काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे.... हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्याआमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाया या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAbhijit Jaysing Angne

    With every story that I read from this book..I kept giving claps for your exemplary Marathi Translation.

  • Rating StarPawan Chandak

    आयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी "`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले। धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    सुधामूर्तीं लिखीत पुस्तक आयुष्याचे धडे गिरवताना पुर्ण वाचुन झाली, कळलंच नाही केव्हा वाचून संपलं इतके अतिशय साधं,सोपं आणि छान लिखाण. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक लहान-मोठे अनुभव सुधामूर्तींनी सांगितले आहे.आपल्या आयुष्यात येणारा जवळपास प्रत्ेक व्यक्ती काहीतरी आपल्या प्रत्येकाला काहीन काही शिकवून जातो हे मात्र अगदी खरं. सूधा मूर्ती यांची पुस्तकं अतिशय छान. ती पुस्तके सोपी आणि लगेच समझणारी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठेही मोठेपणा नसतो. इन्फोसिस फाउंडेशन च्या माध्यमातून सामजिक कार्य करतांना तसेच आयुष्याचे धडे गिरवितांंना त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ति तसेच ऐतिहासिक वास्तू यांच्या कडे एका नैतिक स्टोरी च्या माध्यमातून मांडलेले विचार म्हणजे ही कादंबरी आहे. ट्रेन मध्ये मिळालीली एक अनाथ गरीब मुलगी जिला दत्तक घेऊन उच्च शिक्षण देऊन त्या बळावर तिने अमेरिके पर्यंत घेतलेली झेप. अश्या 23 वेगवेगळ्या व्यक्ति रेखेला एका नैतिक निर्णायक प्रारूप मध्ये सुधा मुर्तींंनी मांडले आहे... सुधा मूर्तींना आपल्या विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. हे पुस्तक मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. .. ...Read more

  • Rating StarVaibhav Todkar

    "Infosys Foundation" च्या अध्यक्षपदी असलेल्या सुविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका सुधा मूर्ती लिखित हे अप्रतिम पुस्तक.प्रस्तुत पुस्तकात त्यांना भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे ही कथरूपात त्यांनी सादर केली आहे.अतिशय सरळ सोपी भाषा आणि प्रत्ेक गोष्टीत एक गहिरा अर्थ ,शिकवण असा छान मेळ आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more