* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AVATI BHAVATI
  • Availability : Available
  • ISBN : 9789387319615
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VIJAYA RAJADYAKSHA COMBO-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
N/A
‘अवती भवती’ हा ख्यातनाम संवेदनशील लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ललित लेखसंग्रह आहे. विजयाबार्इंची कथा/लेख विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करतो आणि तरल, काव्यात्म शैलीमुळे अशी कथा विंÂवा लेख वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. आपल्या आसपास घडणाNया, अगदी साध्या वाटणाNया घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती, कविता विंÂवा एखादे पुस्तक, आवडता लेखक-कवी अथवा त्यांना भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) विंÂवा कोणताही शब्द (उदा.- आरंभ, चंद्रोदय, उरलेपण, संवाद, दिंडी, चिक्कणमाती, नातीगोती) असो; विजयाबाई त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय ललित लेख लिहितात. त्यामध्ये विजयाबाई त्या संदर्भातील एखादी आठवण, जीवनातील एखादा अनुभव, त्या वेळी त्यांचे आणि आजूबाजूला असणाNया लोकांचे वागणे अथवा त्या संदर्भात मनात आलेल्या विचारांचे अगदी नेमके, आटोपशीर वर्णन करतात. हे सर्व त्या कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे एखाद्या व्यक्तीला गोष्ट सांगावी इतक्या हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात. सदर पुस्तकातील ललित लेख वाचताना हाच अनुभव येतो. उदा.- ‘बायकांचा डबा’ हा लेख महिलांसाठी आरक्षित असलेल्या रेल्वेच्या डब्याविषयी आहे. त्या अनुषंगाने रेल्वे फलाटावरील गर्दी विशेषत: बायकांची; प्रत्यक्ष रेल्वेगाडी फलाटावर थांबताच जागा पकडण्यासाठी घाईघाईने डब्यात शिरणाNया आणि इाQच्छत स्थळ आल्यामुळे डब्यातून बाहेर येऊ पाहाणाNया बायकांची गर्दी, ढकलाढकली, रेटारेटीचे वर्णन येते. एका विशिष्ट वेळी येणाNया रेल्वेने (लोकलने) नेहमी प्रवास (ये-जा) करणाNया महिला, त्यांचे आपापले ग्रुप, एकमेकींसाठी त्या जागा धरतात. (राखून ठेवतात.) गप्पा मारणे हा तर बायकांच्या खूप आवडीचा विषय. वेळ असेल त्यानुसार एकमेकींचा वाढदिवस साजरा करणे, हळदी- कुंकू संक्रांतीला तीळगुळ वाटप असे छान कार्यक्रम तर होतातच; पण क्वचित भांडाभांडीही! प्रवासात थोडा जास्त वेळ हाताशी असणाNया बायका पुस्तक वाचनाप्रमाणेच जमेल तेवढे शिवण-टिपण, भरतकाम-वीणकाम तसेच अगदी भाजीही निवडतात तर काहीजणी चक्क मस्तपैकी डुलकी घेतात. बसायला जागा मिळवण्यासाठी क्वचित भांडणाNया बायका वेळप्रसंगी - अडचणीच्या वेळी एकमेकींना सद्भावनेने मदतही करतात. अशा तNहेचे सर्व वाचनीय ललित लेख (अर्थात, त्या त्या विषयानुसार) या पुस्तकामध्ये आहेत. आपणही आजूबाजूला असे घटना-प्रसंग थोड्याफार फरकाने दररोज पाहात व अनुभवत असतो; पण विजयाबाई हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने त्यावर लिहून हुबेहुब तो प्रसंग साकारतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AVATIBHAVATI #AVATIBHAVATI #अवतीभवती #SHORTSTORIES #MARATHI #VIJAYARAJADYAKSHA #विजयाराजाध्यक्ष "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more