* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANDHARACHE WARASDAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661965
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN HIS NOVEL, PROF. MORE ILLUSTRATES THE TRUTHFUL AND SCORCHING SIDE OF THE WORLD TODAY. VERY RARELY, THE SLUMS ARE DESCRIBED WITH SUCH INTENSITY REVELING THE UGLY FACTS AND TERRIBLE ACTUALITY. THE NOVEL HAS REACHED A HEIGHT OWING TO THE PERFECT PORTRAYAL OF THE TWO ENDS; RURAL CULTURE AND URBAN TENDENCY OF SELF-INDULGENCE IN ADDITION TO THE TENSIONS AND ATTEMPTS FOR MERE SURVIVAL. THE HERO POSSESSING MANY QUALITIES AND HAS IMMENSE CAPACITY TO BE IN HARMONY YET REMAIN NEUTRAL WITH HIS SURROUNDING OFFERS UNIQUE ANGLE TO THE OVERALL WRITING. THOUGH IN MARATHI, IT IS NOT CONFINED TO OUR STATE, RATHER WITH ITS FOCUS ON VARIOUS ASPECTS OF LIFE, IT HAS SIMPLY CONQUERED THE READERS AT A UNIVERSAL LEVEL. IT IS A MILE-STONE IN THE LITERARY WORLD. THIS NOVEL HAS INDEED SOUGHT A PROFOUND PLACE IN THE MARATHI LITERATURE.
’अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत प्रा. मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविलेले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ठाामीण जीवनातील खोलवर रूजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवादी जीवनाची ओढ, त्यातील ताणतणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी, एकूण मराठी कादंबरी वाङ्मयाला वेगळे परिमाण प्राप्त करून देणारी ठरली आहे. आजच्या युवा पिढीची मानसिकता, जगण्याची अपरिहार्यता उलगडत जाताना ही कादंबरी प्रादेशिकतेच्या, भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विकतेकडे झेप घेते. हेच या कादंबरीचे यश आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ANDHARACHE VARASDAR #DADASAHEB MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    झोपडपट्टीतील कुटुंबावर कायम घोटाळणारे अस्थिरतेचे कृष्णमेघ... अंधाराचे वारसदार ही झोपडपट्टीच्या जीवनाची एक विदारक झलक दाखवणारी कादंबरी. `गबाळ` मध्ये कुडमुड्या जोशी जमातीचे चित्रण करणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी आता त्या जमातीबाहेरच्या जगाकडे, शहरातील झपडपट्ट्यांमधील स्थलांतरितांच्या जीवनसंघर्षाकडे आपले लक्ष वळविले आहे. कॉलेजमध्ये नव्यानेच जाणारा तरुण रमेश सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकणाऱ्या एका टोळीत नकळत ओढला जातो आणि पहिल्याच झटक्यात पोलिसांच्या तावडीत सापडतो. गणपा हातभट्टीवाला व त्याचे साथीदार त्याला जामिनावर सोडवतात खरा, पण दारू, मटका, गर्द, वेश्या, पान सिगारेट– या सर्वांची चटक त्याला लागते; आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकून या व्यसनांची नशा पूर्ण करण्याची त्याची धडपड चालू राहते. पैसे मिळतात पण ते कधीच पुरे पडत नाहीत. नेहमीच कडकी चालू राहते. उधार उसनवार करावी लागते. तशात शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन स्थलांतर करण्याची योजना कार्यान्वित होते. आठ-दहा झोपडपट्ट्यातील हजार-बाराशे कुटुंबांना शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या काळ्या रानात हलवण्यात येते. प्रत्येकी पंधरा बाय दहा फुटांची जागा, अशा चाळीस-पन्नास घरांची रांग, दोन रांगांमध्ये कच्चा मुरुम टाकून केलेले रस्ते– नगरपालिकेनं तयार केलेल्या यादीनुसार जागांचे वाटप होत राहते. घरे कधी बांधून होणार याचे वेळापत्रक कोणालाच ठाऊक नसते. तात्पुरती सोय म्हणून प्रत्येक कुटुंबाला थोडे कळक दिले होते. त्या बांबूच्या कळकांनी खोपटं किंवा झोपडी उभी करून तात्पुरता निवारा ज्याचा त्यानं उभा करायचा होता. त्याप्रमाणं लोक कुठून-कुठून पालापाचोळा, पत्रे, प्लॅस्टिक शीट वगैरे आणून आपला उघड्यावरचा संसार झाकण्याचा प्रयत्न करत होते. उघड्यावरच चुल धडधडत होत्या. खाणं-पिणं चालू होतं. बायाबापड्या चार-सहा घरात धुणं-भांडी करून संसाराला हातभार लावत. शाळा लांब. त्यामुळं मुलं आळस करत. झोपडपट्टीतल्या लोकांचे नाना उद्योग. कोणी माकडवाले होते, कोणी चिंध्या कागद गोळा करणारे. कोणी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करीत. कोणी आडत दुकानात हमाली करत. पोपटवाले जोशी पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगत. कोणी भाकरीचे शिळे तुकडे वाळवून बिस्किटाच्या कारखान्यात, पाव-ब्रेडच्या बेकरीत देत. दादासाहेब मोरे या झोपडपट्टीतील वेगवेगळ्या माणसांचे व समस्यांचे वैविध्य दाखवू पाहतात. त्यासाठी रमेशच्या कुटुंबाप्रमाणेच सुनीलच्या कुटुंबालाही मध्यवर्ती स्थान देतात. स्थानांतरामुळे अनेकांच्या रोजी-रोटीतही व्यत्यय येतो. सुनीलचा बाप रामाप्पा व आई सावित्रीबाई चौथ्या मजल्यावरच्या स्लॅबचं सिमेंट ओतण्याच्या कामाला जातात. शिडीवरून पाट्या वर पोचवताना रामाप्पा खाली पडतो. लोखंडी सळ्यांवर पडल्याने, त्याच्या मांडीत सळ्या घुसतात. रक्त वाहू लागते. त्याला ठेकेदार हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सावित्रीबाईही त्याच्या मागोमाग जाते. डॉक्टर उजवा पाय मांडीपासून कापतात. ते म्हणतात, ``महिनाभर हालचाल करायची नाही. कुबड्या लावून चालायची सवय करावी लागेल. दर आठवड्याला तपासणीसाठी या.`` मुलगा सुनील शाळा चुकवू लागतो. आईलाही कामावर जाणे कठीण होते. इमारतीचा मालक औषध-पाण्यासाठी थोडे पैसे देतो. झोपडपट्टीवाल्यांच्या घरबांधणीच्या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा मोर्चा काढण्याचे ठरते. सुदाम, नऱ्या, रमेश व इतर तरुण मोर्चाची तयारी करतात. ``तुम्ही मोर्चात आला तरच तुम्हाला घर मिळेल. निवेदनावर सही नाहीतर आंगठा करा.`` त्या निवेदनाच्या प्रती कलेक्टर, पोलीस स्टेशन, वृत्तपत्रे यांना देण्यात येतात. कापडी बॅनर्स तयार करण्यात येतात. मोर्चापुढे सुदामचे भाषण होते. निवेदन नगराध्यक्षांना देण्यात येते. रमेशचा दोस्त नऱ्या एकदा रमेशच्या बहिणीला– शेवंतीला एकटीच गाठतो. ``तुझ्या भावाचा दोस्त तर आहेच. मग तुझा दोस्त झालो तर काम बिघडलं? ... ``शेवंता त्याच्या अंगावर तांब्या भिरकावते. डोकं धरून तो झोपडीबाहेर पळतो. लोक झोपडीपुढे जमतात. पण गुंड नऱ्याशी वैर घ्यायला कोणीच तयार नसते. पण तेवढ्यात रमेश चाकू घेऊन नऱ्याचा बदला घ्यायला येतो. गणपाला बघून मात्र तो पाय मागे घेतो. नगरपालिकेच्या निवडणुकांची धांदल सुरू होते. तशात या झोपडपट्टीला आग लागते. अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत बहुतेक झोपड्या जळून खाक होतात. पुढारी झोपडपट्टीला भेट देतात. आश्वासने देतात. गुंड नऱ्या इतर टोळीवाल्यांना सांगतो, ``आपण मदतीसाठी फेऱ्या काढू. धान्य, पैसा इ. काही हाती लागले तर बघू. नाहीतर झोपडीही गेली आणि संधीही गेली असं होईल. आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं.`` मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे– मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे– निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो. ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते. दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला– या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दु:खाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अध:पतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सर्वाधिक सतावते. ``उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती`` अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते– असा इशारा ही कादंबरी देते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-06-2002

    संयमित आविष्कार... समकालीन जीवनाचा तलस्पर्शी वेध घेणारा साहित्य प्रकार म्हणून ‘कादंबरी’चा उल्लेख केला जातो. त्यामुळे जीवनात प्रत्यही घडणारी परिवर्तने कादंबरीतून पाहायला मिळतात. मध्यमवर्गीय जीवनातली स्थित्यंतरे हा अगिणत कादंबऱ्यांचा गाभा आहे, त्याच्य जोडीला साठोत्तरी कालखंडात झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांच्या व्यथा वेदनांसह टिपण्याचा प्रयत्न सुरू झाला. शहरांशी निगडीत झोपडपट्ट्यांची दखल मराठीत ‘चक्र’, ‘वासूनाका’, ‘माहीमची खाडी’ आदी कादंबऱ्यांनी प्रथमच प्रभावीपणाने घेतली, त्यांच्यामधून झोपडपट्टीचे सांस्कृतिक अनुबंध, सामाजिक संबंध, आर्थिक आकृतिबंध यांचा मराठी वाचकांना परिचय होत गेला. हा संपन्न वारसा सांभाळत दादासाहेब मोरे यांची ‘अंधाराचे वारसदार’ ही कादंबरी अवतरली आहे. तिच्यात झोपडपट्टीतील जीवनकलहाचा मुकाटपणा, सोशिकपणा आणि भाबडेपणाही अनेक घटना, प्रसंगांतून वर्णन केलेला आहे. ग्रामीण भागातील माणसे जिवंत राहण्यासाठी शहरात येऊन स्थायिक होतात, त्यांना झोपडपट्टीचा आश्रय मिळतो. अशा माणसांना शहरी जीवनात रुळताना दुभंगलेपणाचा भोग अटळपणाने भोगावा लागतो. भकासपणा त्यांच्या जीवनाचा भाग बनतो. अशा माणसांच्या पुढील पिढीला बकालपणा शाप वाट्याला येतो. भय, भूक आणि भ्रष्टाचार यांच्या विळख्यात झोपडपट्टीचे जीवन सापडते. साहजिकच एकेकाळी प्रकाशाचे शिल्पकार असलेल्या ग्रामीण कुटुंबातून शहरी पर्यावरणात ‘अंधाराचे वारसदार’ कसे निर्माण होतात याचे हृदय आणि सुरेख चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही आदिम काळापासूनची मानवी शुभेच्छा असूनही जगातील अगणित मानवगटांना अंधारातून अंधाराकडे वाटचाल करावी लागत आहे. अशा अभावग्रस्त ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत असाच एक उल्लेखनीय प्रयत्न झाला आहे. स्वत:च्या पोटासाठी, मुलांच्या पाटी, पेन्सिलीसाठी शहराच्या आश्रयाला आलेल्या ग्रामीण समूहाच्या नशिबी ‘आगीतून फुफाट्यात पडणे’ कसे येते याचे विदारक चित्रण या कादंबरीत केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ही कादंबरी सिद्रामचे कुटुंब, नऱ्याची टोळी, गणपा दादाचा गोतावळा, झोपडपट्टीची दिनचर्या यांच्याशी निगडीत आहे. सिद्राम आपली पत्नी राधाबाई आणि मुले रमेश, सुरेश शेवंतासह लवंगी गावाहून सांगली शहराच्या झोपडपट्टीत राहू लागतो. इथे त्याला आणखी दोन मुले होतात. एकवीस वर्षांचा रमेश महाविद्यालयीन युवक आहे. तो सिनेमाची तिकिटे काळ्या बाजारात विकणाऱ्या नऱ्याच्या टोळीकडे ओढला जातो. यानिमित्ताने पहिल्या प्रकरणात सिनेमा तिकिटांच्या काळ्या बाजाराच्या यंत्रणेवर भेदक प्रकाश टाकला आहे. सहज मिळणाऱ्या पैशामुळे नऱ्या, सुनील, विलास, अकबर, रमेश असे अनेक युवक व्यसनांच्या आहारी जातात. मद्यप्राशन, वेश्यागमन, धूम्रपानही त्यांच्या अंगवळणी पडतात. एका झोपडपट्टीची दिनचर्या हा कादंबरीचा गाभा आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी रिमांड होमजवळील झोपडपट्टीचे नव्या जागेत पुनर्वसन होणार म्हणून तेथील लोकांच्या आशा पल्लवित होतात. तिसऱ्या प्रकरणात झोपडपट्टीला पुनर्वसन मंत्री ना. पोटारते साहेब भेट देतात. त्यांच्या कार्यक्रमाचा आँखो देखा हाल सादर केलेला आहे. पाचव्या प्रकरणात झोपडपट्टीचे नव्या जागेत स्थलांतर होते. त्यामुळे शिक्षण, सुविधा, रोजगारविषयक नव्या समस्या निर्माण होतात. सहाव्या प्रकरणात झोपडपट्टीला पाऊस झोडपून काढतो. आठव्या प्रकरणात गणपा दादाच्या पुढाकारने झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा काढण्यात येतो. दहाव्या प्रकरणात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने झोपडपट्टीचे जीवन ढवळून निघते. याच वेळी तिला भीषण आग लागते. अकराव्या प्रकरणात जळितग्रस्तांच्या मदतीसाठी झोपडपट्टीतील युवक गावभर फिरून मदत गोळा करतात. तिच्या वाटपात भ्रष्टाचार होतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री पद्धतशीर पैसे वाटप होऊन गणपा दादा निवडून येतो, अशा झोपडपट्टीच्या दिनचर्येत दादासाहेब मोरेंनी अनेक नाट्यपूर्ण घटना, प्रसंग कौशल्याने गुंफले आहेत. दलित, मुस्लिम, मातंग, गोसावी, साप गारुडी, माकडवाले, मराठा, कुणबी अशा लोकांचीही बहुजिनसी झोपडपट्टी आहे. हे लोक उपजीविकेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करतात. त्यापैकी अहमद, रशीद आणि मुन्ना यांच्या नाग-मुंगसाचा सार्वजनिक खेळ तपशीलवार वर्णन केला आहे. त्यांची लुटुपुटूची लढाई खरोखरची होऊन त्यात मुंगूस नागाला मारून टाकतो. या कादंबरीच्या शेवटी रमेश नऱ्याचा खून करतो. या दोन्ही घटनांमधील सूचकता लक्षणीय आहे. झोपडपट्टी जीवनाच्या पार्श्वभूमीवर नऱ्या, रमेश, सुनील, विलास, अकबर अशा काही प्रातिनिधिक युवकांचा अध:पात दाखवणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती अंत:सूत्र आहे. पहिल्या प्रकरणात साक्षीभूत असलेला रमेश पुढे गुन्हेगारी जगताचा एक भाग बनतो. त्याचे घरांपासून तुटत जाणे अधिक तपशिलात हवे होते. कदाचित, घुमेपणा, निमूटपणा, नेमस्तपणा हे रमेशचे व्यक्तिमत्त्व विशेष कादंबरीकाराला अभिप्रेत असावेत. आपल्या तरुण बहिणीवर- शेवंतावर नऱ्याने अतिप्रसंग केला म्हणून सूडाच्या भावनेने रमेश पेटतो. त्याच्या नैतिक कल्पनांना धक्का बसून तो नऱ्याची हत्या करतो. सुनील गर्दच्या आहारी गेला आहे. नशा करण्यासाठी तो घरातील भांडी विकतो. त्याचे वडील रामाप्पा आणि सावित्रीबाई यांची कहाणी करुणामय वाटते. या संपूर्ण कादंबरीत ‘अंधाराचा वारसदार’ म्हणून खऱ्या अर्थाने नऱ्या वावरतो. तो रगेल, रंगेल, दिलदार, बेंडर, समजदार अशा वृत्ती प्रवृत्तीचा आहे. सुरेश रमेशच्या पावलावर पावले टाकू लागतो. तेव्हा, रमेश, सुनील, सुरेश ही तरुण मुले प्रकाशाचे वारसदार होण्याचे टाळून अंधाराचे वारसदार कसे होतात, याचे प्रभावी चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ते करताना त्यांनी भडक, उथळ, बटबटीतपणा न दाखवता, सूक्ष्म, संयमशील, संवेदनायुक्त आविष्कार साधला आहे. आततायी, आक्रस्ताळी दृष्टी न ठेवता विवेकपूर्ण अभिव्यक्ती केली आहे म्हणून ही कादंबरी वाचनीय झाली आहे. प्रा. विजय काचरे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत दादासाहेब मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ग्रामीण जीवनातील खोलवर रुजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवाद जीवनाची ओढ, त्यातील ताण-तणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी एकूण मराठी कादंबरी वाङमयाला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारी ठरेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more