* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AMINA
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9788184980875
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 239.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MOVING STORY OF A WOMAN WHO CHALLENGES THE RESTRICTIONS OF THE LIFE SHE IS BORN INTO, AND IN SO DOING HELPS TO BRING ABOUT CHANGE FOR MORE THAN JUST HERSELF. IT ILLUMINATES ISSUES WHICH RARELY APPEAR IN FICTION BUT WHICH STRUCTURE THE LIVES OF MILLIONS OF WOMEN - THE LEGAL STATUS OF MUSLIM WOMEN, THE LIMITATIONS IMPOSED ON THEM BY TRADITIONAL AND RELIGIOUS CONVENTIONS, THE RESTRICTIONS ON THEIR ECONOMIC ACTIVITIES, THE HUMILIATIONS VISITED ON THEM AS A RESULT OF UNQUESTIONED MALE POWER IN PERSONAL RELATIONSHIPS. IT ENGAGES THE READER`S SYMPATHY THROUGH ITS BELIEVABLE PORTRAYAL OF ONE REMARKABLE CONTEMPORARY WOMAN. WRITTEN WITH THE PASSION BORN OF REAL EXPERIENCE, THIS REMARKABLE PORTRAYAL THROUGH THE EYES OF A WOMAN BY A NORTHERN NIGERIAN MAN LEAVES THE READER WITH HOPE FOR THE FUTURE. 1ST PUBLISHED IN ENGLISH BY AFRICA WORLD PRESS, NEW JERSEY, AMINA HAS BEEN TRANSLATED INTO 20 LANGUAGES - GREEK, SERBIAN, ARABIC, AZERI, URDU, HINDI, MALAYALAM, TAMIL, BAHASA INDONESIA, KOREAN, MARATHI, PUNJABI, RUSSIAN, SPANISH, FINNISH, ESTONIAN, KANNADA, HAUSA, VIETNAMESE AND CHINESE. IT HAS BEEN RECEIVED BY THOUSANDS OF WOMEN AND MEN AS A BOOK THAT `TELLS IT AS IT IS.`
नायजेरियाच्या उत्तर भागातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंब-यांची संख्या अत्यल्पच आहे, त्यामुळे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे साहित्यिक विश्वातली एक महत्त्वाची घटनाच ठरते. कथानायिका आणि तिच्या साथीदारांनी नायजेरियाच्या समाजव्यवस्थेतील महिलांच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या या नाट्यपूर्ण कथेतून - कथा-कादंबNयांतून अभावानेच आढळणारा राजकीय समस्यांचा आलेख - मुस्लीम महिलांचे कायद्याच्या दृष्टीने असलेले स्थान, परंपरांनी आणि धार्मिक रूढी, समजुतींनी त्यांच्यावर लादलेल्या मर्यादा, आर्थिक व्यवहाराच्या कामांमधील त्यांच्या सहभागावर असणारी बंधने, भ्रष्ट पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे एकूणच समाजावर आणि विशेषत: स्त्रियांवर होणारे विघातक परिणाम, व्यक्तिगत आयुष्यातही पुरुषी ताकदीच्या बळावर महिलांना दिली जाणारी अत्यंत अपमानास्पद वागणूक- असा विस्तृत पट एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडतो. आत्मपरीक्षणातून बंधमुक्ती साधणा-या नायजेरियन स्त्रीची अत्यंत कल्पकतेने आणि कुशलतेने बांधलेली ही कथा आहे. ही कादंबरी निव्वळ सामाजिक दस्तऐवज न राहता वाचकाला त्यातील कथानायिकेच्या - अमिनाच्या सहवेदना भोगायला भाग पाडते. ‘अमिना’ ही एक अत्यंत सुयोग्य वेळी प्रकाशित झालेली कादंबरी आहे आणि हे कथानक इतक्या उत्तम रीतीने आपल्यासमोर आकार घेत जाते की त्याची तुलना ऐतिहासिक दंतकथांमधील १६व्या शतकातील झज्जाऊ येथील साहसी राणी हौसा आणि अमिना यांच्या आयुष्याशी केल्याशिवाय आपण राहात नाही. नायजेरियामध्ये बदल घडून येण्यास वाव आहे असा आशेचा किरण ही कादंबरी निश्चितच दाखवते.
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट अनुवादासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार २००८-०९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AMINA #AMINA #अमिना #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYBHIDE #उदयभिडे #MOHAMMEDUMAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 21-02-2010

    नायजेरियातील महिलांचा आक्रोश... नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेल्या भागातील ही साहित्यकृती आहे. धार्मिक रूढी, परंपरा आणि त्यामुळे महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक याबद्दलचे वर्णन अमिना या कादंबरीत येत राहते. महिलांवर होणारे अत्याचार आणि अजिबा हालचाल करता न येणारी परिस्थिती याचा परखड लेखाजोखा या कादंबरीत प्रामाणिकपणे आला आहे. ‘अमिना’ या मोहंमद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा आविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो. ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 7-2-2010

    `अमिना` या मोहम्मद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा अविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो.

  • Rating StarDAILY SAKAL 4-4-2010

    नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेंल्या भागातील ही साहित्यकृती. धार्मिक रूढी, परंपरा, महिलांवरची असह्य बंधन यांचं हे कुशलतेनं केलेलं प्रामाणिक कथन आहे. मोहंमद उमर यांचा हा कथाविष्कार वाचकाला अंर्तमुख करतो.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more