* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TODAY, WE SEE THAT INDIA IS PROGRESSING WELL IN THE FIELD OF SCIENCE. BUT WE HAVE TO REALIZE THAT INDIA HAD MADE ADVANCED PROGRESS IN THE FIELD OF SCIENCE AND TECHNOLOGY IN THE OLD AGE AS WELL. THOUGH THE GOVERNMENT PROVIDES AIDS THESE DAYS, IN VARIOUS FORMS, EARLIER THIS AID WAS NOT EASILY AVAILABLE. YET, MANY EMINENT SCHOLARS HAD PUT IN RELENTLESS EFFORTS AND HAD COME UP WITH WONDERFUL INVENTIONS BENEFITTING THE HUMAN RACE IN THE LONG TERM. SOME LIKE RAMAN, BOSE, SAHA, BHABHA AND BHATNAGAR WERE FELICITATED AND ACKNOWLEDGED. WE HAVE TO KEEP IN MIND THAT BEHIND EVERY SUCCESSFUL PERSON THERE ARE A DOZEN OF PEOPLE WHO NEVER GET ANY RECOGNITION. THEY KEEP ON WORKING WITHOUT EXPECTING ANY CREDIT. THEY PREFER TO REMAIN IN DARK. THEY WORK TO SATISFY THEIR OWN MINDS. THEY WORK FOR THE SAKE OF WORK. THE ADVANCED COUNTRY THAT INDIA HAS BECOME TODAY STANDS ERECT ON THE FOUNDATION OF SUCH UNSEEN AND UNHEARD PEOPLE’S EFFORTS. THEY DO NOT RECEIVE ENCOURAGEMENT OR PRAISES. BUT THEY GO ON AND ON. THEY STUDY SCIENCE AND SPEND THEIR LIVES IN SPREADING THE IMPORTANCE OF SCIENCE. TILL DEATH THEY REMAIN ‘NOBODY’ AND DIE AS ‘NOBODY.’ THEY LEAVE BEHIND A STRONG LINEAGE FOR COMMON PEOPLE TO COME AHEAD AND TAKE THE LEAD. THIS BOOK IS AN ATTEMPT TO FELICITATE THESE GREAT PERSONALITIES ALBEIT A BIT LATE.
भारतामध्ये विज्ञानाच्या आघाडीवरील आक्रमण ही दुर्दैवाने सर्वसामान्यपणे समजली जात असल्याप्रमाणे, अलीकडच्या काळात घडलेली घटना नाही. गतकाळातही, विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी मिळणारा उदार पाठिंबा ही सरकार आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होण्यापूर्वी देखील, पुष्कळ भारतीय विद्वानांनी मानवजातीच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापैकी काहीजणांना योग्य ते मानसन्मान मिळाले, काहींना हारतुरेही मिळाले. रामन, बोस, साहा, भाभा, भटनागर ही नावे घराघरांतून परिचित झाली. परंतु अशा प्रत्येक तेजस्वी व्यक्तीमागे शांतपणे काम करणार्‍या दहा व्यक्ती असतात. कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता, अंधारातच ही माणसे अथक परिश्रम करीत असतात. स्वत:च्या समाधानासाठी भरपूर यश मिळवणार्‍या या स्त्री-पुरुषांच्या कामगिरीवरच भारतीय विज्ञानाचा विशाल इमला आज उभा आहे. प्रशंसा आणि प्रोत्साहनाचा अभाव असतानादेखील केवळ स्वत:च्या उत्साहाच्या बळावर त्यांनी विज्ञानाची कार्यवाही केली आणि दूरवर प्रचार केला. आयुष्यामध्ये स्तुतिहीन राहिलेल्या आणि मृत्यूनंतर विस्मृतीत गेलेल्या या लोकांनी विज्ञानाची आघाडी पुढे रेटण्यासाठी उपयोगी ठरणारा वारसा मागे ठेवला आहे. त्यांच्या चरित्रांचा हा संठाह म्हणजे उशिरा केलेला असला, तरी या विस्मृतीत गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांना केलेला मानाचा मुजराच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SHANKARAAGHARKAR#SHANKARBHISE#DEVENDRABOSE#ARDASIRKARSETJI#SHAMBYDEY#CHANDRAGUHA#DATTATRAYKAPAREKAR#RAMCHANDRAMATHUR#RUCHISAHANI#PURANSINGH#MAHENDRALALSARKAR#KOLLACHALSITARAMAIYYA#YELLAPRAGADASUBBARAO#INDIANSCIENTIST#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more