* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN SARE ARJUN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667509
  • Edition : 30
  • Publishing Year : FEBRUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : RELIGIOUS & SPIRITUAL FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARJUN, THE THIRD AMONGST THE PANDAVAS, STANDS FOR HIS SKILL OF ARCHERY AND IS CONSIDERED AS ONE OF THE GREATEST WARRIORS. THE DISTINGUISHED FIGHTER, HOWEVER, FELT CONFUSED WHEN THE FAMOUS MAHABHARAT WAR WAS ABOUT TO BEGIN ON THE BATTLEFIELD OF KURUKSHETRA. HE TURNED TO HIS CHARIOTEER, LORD KRISHNA, FOR ENLIGHTENMENT. THE LORD CLEARED ALL HIS DOUBTS THROUGH THE MOST INSTRUCTIVE AND INTERESTING DISCOURSES THAT CAME TO BE KNOWN AS THE BHAGVAD GITA. THE AUTHOR BELIEVES THAT IN THE PRESENT TIMES OUR POSITION IS NO BETTER THAN ARJUN. WE FACE VARIOUS PROBLEMS IN DAY TO DAY LIFE AND LIKE ARJUN CAN NOT MAKE UP OUR MINDS ON HOW TO SOLVE THEM. IGNORANCE, MISRULE, CORRUPTION, DOUBLE STANDARDS AND MANY SUCH FACTORS MAKE OUR MUNDANE LIFE DIFFICULT. THE AUTHOR DRAWS UP PARALLEL EXAMPLES FROM THE MAHABHARATA AND ATTEMPTS TO OFFER SOLUTIONS. THE TREATMENT OF THE THEMES IN THE ESSAYS IS LIKE THAT OF ART BUCHWALD WHOSE HUMOUR MAKES ONE SMILE AND BE SERIOUS AT THE SAME TIME.
संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा.... किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAkshay Tajne

    लेखक , कथाकथनकार , आर्किटेक्ट , व्हायोलिन व हामोनियम - वादक , उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे , सुंदर रस्ता , सुंदर इमारत , सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते . म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या . मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या . विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा , खरं तर त्या कथा नाहीतच , कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत . एका व्यक्तीच्या विचार - आचारांची पद्धत . वपु त्याला ` पॅटर्न ` म्हणायचे . वपुंनी पॅटर्न्स मांडले . जे आपल्यासहित , आपल्या आवती - भोवती दिसतात . आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सना दाद मिळते . विनोदी कथांमधून हसवता - हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं . ही अशीच जीवनाची तहा आहे , हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं . महाराष्ट्र सरकारनं त्यांना ` उत्तम लेखक ` म्हणून सन्मानित केलं आहे . CONCERN : गीतेतला , महाभारतामधला अर्जुन आणि मी स्वत : किंवा मला भेटणारी प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती ह्यांत मला फरकच वाटत नाही . कृष्णावतार संपला , तो संपलाच ! अर्जुनाचा वंश विसाव्या शतकापर्यंत चालूच आहे . अर्जुनाच्या शंभर पटीनं धृतराष्ट्राच्या शंभर मुलांचाही वंश तितक्या पटीनं वाढतोय . निवडणुकीच्या तिकिटांच्या रांगेत उभा आहे . ह्या निवडणुकीपुरता तरी श्रीविष्णूंनी ‘ शेषा`ला रजा देऊन कदाचित डनलॉप घेतला असेल आणि शेषन रूपानं शेषाला पाठवला असेल . पुन्हा मत देताना विचारवंतांचा अर्जुन होणार . अर्जुनाला समोर शत्रू दिसेचना ; आप्त दिसले , कारण ते आप्त होतेच . ज्यांना दाखवण्यासाठी सिंहासन मिळवायचं , त्यांनाच मारल्यावर राज्याभिषेक कुणासमोर करायचा ? ...Read more

  • Rating StarYogesh Ugale

    सर्वसाधारणपणे दोन वर्षांपासून हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे. वपुंच्या पुस्तकांचं आकर्षण प्रत्येक मराठी वाचकाप्रमाणे मलाही आहेच. त्या आकर्षणापोटी वपुंच्या इतर पुस्तकांबरोबर हेही पुस्तक मी घेतलं. कथा-कादंबऱ्यांची पुस्तकं पटापट वाचून झाली. परंतु या वैचरिक पुस्तकाला हात घालण्यास मन धजावत नव्हते. एक वर्षापूर्वी ‘प्रेममयी’ वाचलेलं अजून आठवतंय. आकाराने अतिशय छोट्या असणाऱ्या या पुस्तकाच्या पाना-पानावर जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान खास वपु काळेंच्या साध्या पण थेट मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या शैलीतून अवतरले आहे.. कथा-कादंबऱ्यांची पुस्तके कधीच वाचून संपवलेली. वाचनाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. मग ‘आपण सारे अर्जुन’ हाती घेतलं. सुरुवातीला हे आपल्याला पेलवेल का, याविषयी साशंकता होती. परंतु नंतर पुस्तकानेच माझी पकड घेतली. एकेक लेख वाचताना जाणिवा विस्तारताहेत, असं वाटायला लागलं. हे पुस्तक वाचताना मलाही माझ्यातला अर्जुन दिसायला लागला. वपुंची खिळवून ठेवणारी लेखनशैली, साधी भाषा, अतिशय गहन तत्त्वज्ञानाला आयुष्यातील प्रसंगांशी जोडण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या पांडित्याचा आव न आणता प्रामाणिकपणे गीतातत्वांचा घेतलेला वेध आणि आपल्याला अर्जुन बनवणाऱ्या आपल्या आयुष्यातील क्षणांची होणारी जाणीव, ही या पुस्तकाची खास आकर्षणे.. खरंतर एवढं सुंदर पुस्तक याआधीच वाचायला हवं होतं, याचीही खंत वाटत राहिली. जसजसे आपण पाने उलटत जातो, तसतसा आपल्यामधला अर्जुनच आपल्याला वाचनात खिळवून ठेवतो. माणसाला तेच लेखन सर्वाधिक आवडतं, ज्यातून माणसाच्या व्यथांचा-वेदनांचा आविष्कार झालेला असतो. या कसोटीवर ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक शत प्रतिशत खरे उतरते. ओशोंचे अमृतमय विचार समजण्याची ताकद आपल्याला वपुंच्या प्रेममय लेखनशैलीतून मिळते. अन्यथा ओशोंच्या तेजस्वी विचारांचे आकलन होणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला जवळ जवळ अशक्यच. वपुंच्या बोटाला धरुन चालल्याने हा प्रवास सुकर होतो. या वाटेवर अधूनमधून गुर्जिएफ, जे. कृष्णमूर्तींसारखी हिरवीगार वळणंही येतात. प्रवास सुरु राहतो. आतला अर्जुन डोकावत राहतो. तत्वविचारांचे सिंचन होत राहते. वाचक आणि लेखक एकरुप होऊन जातात.. माझ्या आयुष्यात अशी फार कमी पुस्तके आहेत, की जी मी परत वाचली असतील. कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतकीच. त्या पुस्तकांमध्ये ‘आपण सारे अर्जुन’चा समावेश झाला आहे.. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (MADHURA) 22-06-2005

    ‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस. खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत. एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या व.पु. काळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील हे एक ‘आपण सारे अर्जुन’. आपली अवस्थाही कायम प्रश्न सोडवताना, ते न सुटता दुसऱ्या प्रश्नाची निर्मिती करणाऱ्याची असते. संजयसारखी दूरदृष्टी आपल्याकडं नाही आणि श्रीकृष्णासारखं निर्विचारी होणं आपल्याला जमत नाही. आपण कायम संभ्रमावस्थेत हेलकावे खात असतो. म्हणूनच अर्जुन होतो. आपण अर्जुनासारखे प्रश्नांच्यात लोंबणारे! निरुत्तरित प्रश्नांचा, मागोवा घेत उत्तराला चाचपडणारे. महाभारतातील घटना, व्यक्ती, गीतासार हे सगळं कसं जसंच्या तसं आजच्या काळात लागू पडतं हे फार हळुवारपणं पण मार्मिकतेनं व.पु.नी या पुस्तकात मांडलंय. अर्जुन म्हटलं की, दुर्योधन आलाच. आंधळ्याचं राज्य आलंच. आज अनेक आंधळ्या राजकर्त्यांची हाताखाली राज्य करतात. आयएएस. प्रामाणिक कस्टम अधिकारी, कमिनशर्स, धृतराष्ट्र जन्मांध आणि आता सारे डोळे असून आंधळे. व.पु. म्हणतात, ‘‘आपल्या मुलाची जन्मत:च नैसर्गिकरित्या लाभलेली कुवत किती आहे हे किती पालकांनी जाणून घेतलंय? प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी; पण अभ्यासक्रम सरसकट एकच. औरंगजेब कसा होता हे कोणाला जाणून घ्यायचं? आपण स्वत: कसे आहोत, याचा अभ्यास का नाही करायचा?’’ या पुस्तकात माणूस, त्याचे आचार-विचार, मानसिक कोंडी, त्याची उकल, पलायनवाद, आत्मीयता, कलेले बहाणे, पांघरलेले पडदे, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे क्षण, तो झटका, नंतरची तडफड.... हे असं सगळं अपरिहार्य म्हणून स्वीकारार्ह. त्यातूनच सापडणारा प्रकाशकिरण दूरवर दिसणारं यशोशिखर आणि मधील धूसर पाऊलवाट. अशी सारी गंमत या पुस्तकात आहे. आयुष्यातील अनेक घटनांचं एका शब्दात वर्णन म्हणजे - टाळ्या, हशे, चेष्टामस्करी, आनंद, समाधान, चैतन्य, जोम, जोश, उत्साह, लाजणं, सुधारणं, घसरणं, आपटणं, निर्मितीक्षण, राग, क्रोध, संताप, तापटपण, भांडण, हेवेदावे, पश्चात्ताप, मारणं, अश्रू, माया, वात्सल्य, शीतयुद्ध... आणि असेच खूप काही या पुस्तकात आहे. माणसाची अपरिहार्यता, संभ्रमावस्था, असहायता काय असते? आत्मघृणा, आत्मप्रौढी, आत्महत्या, अहंभव हे काय आहे? मैत्री म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, देव, दैव, प्रारब्ध, दिव्यशक्ती, तपस्या, श्रद्धा्र, भक्ती, संकल्प, व्रतवैकल्य, उपवास, उपासना, गुरू हे कशासाठी? अर्पणभाव, टेलिपथी, पलायनवाद कशाला म्हणतात? या पुस्तकात या सर्वांचा ऊहापोह केला आहे. दिवसेंदिवस कोरड्या होत चाललेल्या समाजाला अत्यावश्यक असलेले मनमंथन केलं आहे आणि ते एका भावनाप्रधान लेखकाने - व.पु.नी त्यांची ख्यातीच आहे की, मनाला हात घालणारे, स्पर्श करून उकल करणारे लेखक. व.पु. काळे म्हणतात, ‘‘विसाव्या शतकातला मी अर्जुन आहे.’ २१वे शतक त्याहून वेगळे नाही. ओशोची गीता प्रवचने ऐकल्यावर व.पु. नी हे पुस्तक आपोआप लिहिलं आणि ते वाचल्यावर माझा अर्जुन झाला. माझ्या आयुष्यातील प्रश्नमालिका एकामागून एक सरकत गेल्या आणि मी हरवले. शेवटी सांगावंस वाटतं गीता, महाभारत, गीतासार, ओशो प्रवचनं वाचाल तर उत्तमच; पण निदान हे १४६ पानाचं ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचावंच वाचावं. लेखक व.पु. काळे म्हणजे हलकंफुलकं पण मनात घुसणारं लिखाण. त्यांनी लिहिलेले सुंदर प्रश्नचिन्हाचं पुस्तकं. -वंदना धर्माधिकारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more