* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663259
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK DEPICTING OUR PRESENT-DAY STRESSFUL LIFE AND SUGGESTING SOME SIMPLE WAYS OF REDUCING STRAIN AND LEADING A MORE RELAXED LIFE.
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थवूÂन जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत नाईक

    ‘आपण, आपले ताणतणाव- एक चिंतन’ या पुस्तकाच्या रूपाने मला परीसच सापडला. पुस्तकातील तुम्ही दिलेली उदाहरणे आमच्या रोजच्या जीवनातीलच आहेत. ती लगेच भावतात. एका चांगल्या विषयाला आपण चालना दिली आहे.

  • Rating StarLOKSATTA 16-3-2003

    घाई आपल्या पाचवीलाच पुजलेली असते. विकासाची सांगड आपण शहरीकरणाशी घातली आणि प्रदूषण, धावपळ, दगदग, चिंता यांना मुक्तद्वारं दिलं. डॉ. रिचर्ड कार्ल्सन हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्ट्रेस कन्सल्टंट. ‘आपण आणि आपले ताणतणाव’ हे पुस्तक त्यांच्या या विषयावरच्या पु्तकांवर आधारित आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावर भर दिला आहे. कुटुंब हा आपल्या जीवनपद्धतीशी मिळतेजुळते असल्याने ते मराठीत आणण्याचा विचार झाला, तरी हा अनुवाद नव्हे, हे लेखकाने मुद्दाम नमूद केले आहे. यातील घटना-प्रसंग आपल्याच आजूबाजूच्या वातावरणातून घेतलेले आहेत. लेखनही सोप्या, संवाद साधणाऱ्या भाषेत केलेले असल्याने नवे विचारही चटकन आपलेसे होतात. ‘आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रमाणावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असतं.’ हे लक्षात घेतलं, की आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा बागुलबोवा पळून जाईल. चुका होणारच. त्यांच (पश्चत्तापाचंही) अवडंबर किती माजवायचं, तेही आपणच ठरवायला हवं. ध्यानधारणेचं महत्त्व आता बहुतेकांना पटू लागलंय. आपल्याच मनाला थोडं वेगळं वळण लावण्यानेही बरेच ताण नाहीसे होतात, हे लेखकाने प्रत्यक्ष प्रसंग सांगून छान सांगून छान समजावून दिलं आहे. सुबत्तेचा आणि संतोषाचा काहीही संबंध नाही, हे तर स्वच्छच आहे. कृतज्ञ असणं हा एक मोठाच अॅसेट आहे. जिब्राननं लग्नाबद्दल लिहिताना म्हटलेलं ‘आपली हृदयं परस्परांना द्या, पण ती परस्परांच्या अधीन करू नका’ - लग्नालाच नव्हे, तर प्रत्येक नातेसंबंधाला लागू पडतं. घरची माणसं हक्काची आहेत, असं म्हणत बाहेरचा राग त्यांच्यावर काढताना त्यांनाही याचा त्रास होईल, याचा विचार आपण करत नाही. अशाच छोट्या-छोट्या गोष्टींना नव्या कोनातून बघण्याची जादू आपलं आयुष्य आनंददायी करू शकते, हा मोठाच दिलासा या पुस्तकानं दिला आहे. ...Read more

  • Rating StarMUMBAI TARUN BHARAT 17-11-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत माणसाचे मन अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. परिणामी मानसिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. मन हे आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक. मनाचं हे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून संतांनी मन प्रसन्न करण्याचे मार्ग सांगितले आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन. मानसिक रोगाने पछाडलेले अनेक लोक आपल्याला भेटतात. समाजातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली वावरत असते. घरात आणि घराबाहेर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. नेमके हेच हेरून अंजनी नरवणे यांनी ‘आपण, आपले ताणतणाव - एक चिंतन’ या पुस्तकात मनावर होणाऱ्या ताणावर विचार मांडले आहेत व वाचकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात लेखिकेने अमेरिकन लेखक आणि ताण व आनंद या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड कार्ल्सन यांचे विचार व स्वत:चे विचार यांची गुंफण केली आहे. मनावरील ताणतणाव कमी करणं आणि जीवन अधिक सुखद व आनंदमय करणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असतं असं लेखिकेचं म्हणणं आहे. पहिल्या भागात आपल्या मनाबाबत विचार करताना ‘आपण आणि आपलं मन’ या प्रकरणाखाली आपण आणि परिस्थिती, आपली वागणूक यात चुका आपण करतो आहोत का, तणावांना तोंड कसं द्यावं, आपण असे वागलो तर अशा अनेक मार्गांचा विचार केला आहे. लेखिकेने प्रसंग उद्धृत करून त्या समस्या कशा सोडवू शकू याचा विचार केला आहे. ‘आपण आणि आपलं कुटुंब’ या प्रकरणात कुटुंबातील समस्यांचा विचार करताना लेखक म्हणतो, कृतज्ञ आणि आनंदी असणं किती फायदेशीर आहे, दुसऱ्याला दोष देत राहण्यापेक्षा आपुलकीनं समजुतीनं कसं वागावं, आपलं कौटुंबिक वातावरण कसं असावं तसंच मुलांचं संगोपन, आपलं घर, घरातली कामं, आपलं वागणं कसं सुधारावं याबद्दल लेखिका सांगते. ‘आपण, नातीगोती आणि मित्रपरिवार’ या प्रकरणात आपलं इतरांशी वागणं कसं असावं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची माहिती लेखिका देते. ‘आपण आणि भोवतालचं वातावरण’ या प्रकरणात आपलं काम, आपल्या तक्रारी, आपले ताण कमी करणं, ते करताना समोरच्या माणसाच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घेऊन बोलणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजुतीनं, आनंदानं राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी किंवा दूर करण्यासाठी झटावं तसेच लहानसहान अडचणींचा बाऊ न करता त्या सोडविण्याकडे कल असावा असा लेखिका सल्ला देते. सदर पुस्तक वाचून जीवनातील ताणतणाव दूर करावेत व आपले जीवन अधिक सुखकर करावे, त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more