* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAMAR MEYEBELA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177661057
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 310.00 gms
  • Pages : 308
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK PRESENTS TASLIMA NASREEN`S CHILDHOOD IN HER OWN WORDS.MUKTIVAHINI` IN BANGLADESH FOUGHT BRAVELY AND ULTIMATELY FOR THE FREEDOM, TASLIMA WAS JUST 9 YEARS OLD AT THAT TIME, BUT HAD A VERY SENSITIVE AND CONTEMPLATIVE MIND THEN. SHE HAD A PENETRATING GAZE AND SHARP MEMORY. HER FATHER WAS VERY INTELLIGENT BUT WAS DEVIATED. HER MOTHER WAS VERY LOVING AND RELIGIOUS, BUT SLOWLY SHE BECAME BLIND IN THE NAME OF RELIGION. HER BROTHER LOVED HER IMMENSELY. SHE WAS SEXUALLY HARASSED BY HER OWN RELATIVES, SHE CARRIED THE SHAME AND INSULT WITH HER THROUGHOUT HER LIFE DUE TO IT. SHE ALSO WITNESSED THE ATROCITY BY PEER AMIRULLAH IN THE NAME OF RELIGION. VERY BOLDLY, SHE HAS PUT ALL THIS INTO WORDS. HER WORDS ARE BRAVE AND HONEST. TILL NOW, WE HAVE PUBLISHED FIVE BOOKS BY THIS SAME AUTHOR, THEY ARE; LAJJA (NOVEL), PHERA (NOVEL), NIRBACHIT KALAM (STORIES), NIRBACHIT KAVITA (POEMS), AND NASHTA MEYER, NASHTA GADYA (STORIES). THIS NEW BOOK IS A NARRATION OF HER EXPERIENCES, THEY ALL ARE VERY GENUINE. ALL THE CHARACTERS ARE TRUE, NOT EVEN A SINGLE ONE IS FICTITIOUS. NO ONE IN BENGAL HAS DARED TO WRITE WITH SUCH HONESTY AND VIVIDNESS. HER SHARP AND BRIGHT LANGUAGE HAS AN AURA AROUND IT. SHE HAS CHARACTERIZED EACH ONE VERY LIVELY. HER PEN HAS A MAJESTIC TOUCH. HER WRITING HAS A RHYTHM IN IT. ALL THESE QUALITIES MAKE THIS AUTOBIOGRAPHY AN ASTONISHING JOURNEY.
तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं वय होतं फक्त नऊ वर्षांचं; पण त्याही वेळी ती आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या बुद्धिवादी वडिलांचं स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईचं धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधाNया खाईत उतरणं, दादाचं प्रेम, प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळं वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरुल्लाहांनी चालवलेला अत्याचार याचं तिनं धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केलं आहे. या अतिशय संवेदनशील आणि बंडखोर लेखिकेची आम्ही आतापर्यंत लज्जा (कादंबरी), फेरा (कादंबरी), निर्बाचित कलाम (लेखसंग्रह), निर्बाचित कविता (काव्य), नष्ट मेयेर नष्ट गद्य (लेखसंग्रह) अशी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील पाच पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. यांतून तिचं समग्र व्यक्तिमत्त्व प्रक्षेपित झालं आहे. या नव्या पुस्तकातील तिनं निवेदन केलेली एकही घटना खोटी नाही. कुठलंही पात्र काल्पनिक नाही. असं प्रामाणिक, स्पष्ट आत्मवृत्त बंगालीत अजून कोणी लिहिलेलं नाही. धारदारतेजस्वी भाषा, जिवंत व्यक्तिचित्रण आणि लेखणीच्या जादूच्या स्पर्शानं गद्याला आलेलं काव्याचं सौंदर्य ह्यांमुळं ह्या आत्मचरित्राचं वाचन हा वाचकाच्या दृष्टीनं एक आश्चर्यकारक अनुभव ठरणार आहे.
जी.ए.कुलकर्णी पारितोषिक २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं वय होतं फक्त नऊ वर्षांचं; पण त्याही वेळी ती आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृ्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या बुद्धिवादी वडिलांचं स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईचं धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधाNया खाईत उतरणं, दादाचं प्रेम, प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळं वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरुल्लाहांनी चालवलेला अत्याचार याचं तिनं धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केलं आहे. या अतिशय संवेदनशील आणि बंडखोर लेखिकेची आम्ही आतापर्यंत लज्जा (कादंबरी), फेरा (कादंबरी), निर्बाचित कलाम (लेखसंग्रह), निर्बाचित कविता (काव्य), नष्ट मेयेर नष्ट गद्य (लेखसंग्रह) अशी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील पाच पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. यांतून तिचं समग्र व्यक्तिमत्त्व प्रक्षेपित झालं आहे. या नव्या पुस्तकातील तिनं निवेदन केलेली एकही घटना खोटी नाही. कुठलंही पात्र काल्पनिक नाही. असं प्रामाणिक, स्पष्ट आत्मवृत्त बंगालीत अजून कोणी लिहिलेलं नाही. धारदारतेजस्वी भाषा, जिवंत व्यक्तिचित्रण आणि लेखणीच्या जादूच्या स्पर्शानं गद्याला आलेलं काव्याचं सौंदर्य ह्यांमुळं ह्या आत्मचरित्राचं वाचन हा वाचकाच्या दृष्टीनं एक आश्चर्यकारक अनुभव ठरणार आहे. ...Read more

  • Rating StarMANTHAN

    ‘आमार मेयेबेला’ हे तसलिमा नासरिन या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिकेचं आत्मचरित्र आहे. परंपरा अन् प्रथांना आव्हान देण्याचा तसलिमाचा स्वभाव आता वाचनविश्वाला चांगला परिचित झाला आहे. ‘कुवारपण’ सांगतांना देखील ती आपल्या स्वभावगुणाला जागली आहे. तसलिमाचं लिखाण वचलं म्हणजे हटकून असं वाटतं की, कोणत्याही अतिरेकी प्रवृत्तीचा सूड उगविला जाण्याची एक विशिष्ट वेळ असते. मुस्लीम सनातनवाद अन् बुरख्याला सुद्धा अशा तऱ्हेनं ‘तसलिमा’ च्याच लेखणीतून जबाब मिळावा हा अजब न्याय म्हटला पाहिजे. तसलिमा आपलं कुवारपण... बालपणापासून तारुण्याकडे नेणारी अवस्था विदीत करते... पण हळुवारपणे नव्हे... तर आक्रमकतेने सांगते... तिच्या निवेदनात भोवतालची सगळ्या प्रकारची, स्वभावाची पात्र येतात... रुढ चालीरिती... अंधश्रद्धा, समज अपसमज, वातावरण... सगळंच चित्रण येतं... पण हळुवारपणे नव्हे तर अक्षरश: येऊन आदळतं. कारण या अनुभवांच्या प्रगटीकरणात अस्सलता आहे. कुणाला त्यात अतिशयोक्ती वाटली तर तो दोष लेखिको नव्हे तर तिच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचा आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा आहे. स्त्रीयांच शोषण हाच स्थायीभाव असलेल्या समाजाच्या मनोवृत्तीचा आहे. ...Read more

  • Rating StarArchana, Mumbai

    I have read your autobiography part I and II recently. Since then, I have become your fan and waiting for Marathi translation of your other books and next parts of your autobiography. I am a women of your age, but surely I had much more freedom. I ca understand it now. You are a very strong woman, fighting for your principles and I take this opportunity to salute you. I also hope that one day you will surely be in your priya matrubhumi ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-06-2002

    यथासांग व प्रभावी अनुवाद... आपल्या लेखनामुळे बांगला देशातच नव्हे तर इतरत्रही खळबळ उडविणाऱ्या तसलिमा नसरिन यांचे हे पुस्तक. बालपण ते वयात येण्यापर्यंतच्या काळातल्या बऱ्या-वाईट आठवणी म्हणजेच आमार मेयेबेला. आपल्या बालपणातील आठवणीमध्ये आपले घर, घराती माणसे, आई वडील, भाऊ-बहिणी तसेच जवळचे नातेवाईक यांच्या विषयीचे चांगले-वाईट अनुभव लेखिकेने मांडले आहेत. देखणे, शिक्षणाला महत्त्व देणारे डॉक्टर असलेले तरीही अहंकारी विषयासक्त आणि आपल्या मुलांना शिकवून मोठे करण्याचे स्वप्न बाळगणारे वडील, कुरूप, साधी, शिक्षणाबद्दल नावड दर्शवणारी, धर्मवेडी आणि नवऱ्याबद्दल सतत संशय बाळगणारी आई, प्रेमळ मोठा भाऊ, बंडखोर धाकटा भाऊ व लहान बहीण यांचे सांगोपांग वर्णन लेखिकेने केले आहे. तसलिमाच्या तेरा, चौदा वर्षापर्यंतच्या काळात तिच्या स्वातंत्र्यावर तिच्या मनाविरुद्ध वागण्याची केलेली सक्ती, बंधने, त्यामुळे येणारे अस्वस्थपणे, वैफल्यग्रस्त, धर्मवेड्या आईने तिच्यावर केलेली धार्मिक सक्ती, वडिलांकडून शिकण्यासाठी होणारे प्रयत्न, न ऐकल्यास आई वडिलांकडून मिळणारा मार यामुळे तिचे बालपण भयग्रस्त आणि असुरक्षित झाले. धर्म, परंपरा याविषयी पडणारे प्रश्न पण त्याची न मिळणारी उत्तरे, विचारल्यास मार व धमकी यामुळेही तिच्या बालमनावर परिणाम होत होता. याशिवाय जवळच्या नातेवाईक व्यक्तीकडून तिच्यावर झालेला शारीरिक, लैंगिक छळ तो सांगू बोलू न शकल्याने झालेली मानसिकता कुचंबणा याचे लेखिकेने केलेले स्पष्ट व धीट निवेदन यात चित्रित झाले आहे. या पुस्तकातील सर्व पात्रे व घटना सत्य असल्याने व जे जसे आहे तसे, विनासंकोच लिहिल्याने आजच्या बंडखोर, वादग्रस्त, वादळी व्यक्तिमत्त्वाच्या लेखिकेचे मूळ या आठवणीत सापडते. तसलिमाचे असुरक्षित, अस्थिर, बालपणच तिच्या या पुस्तकामुळे आपल्यापुढे उलगडत जाते व तिच्या ओघवती स्पष्ट, सरळ भाषेमुळे आपणही तो काळ तिच्याबरोबर अनुभवतो. मृणालिनी गडकरी यांनी बंगाली भाषेतील अनुवाद मराठीत अगदी यथातथ्य व प्रभावी भाषेत केला आहे. -सौ. शशिकला प्रभावळकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more