* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAKASH ZELTANA
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171865
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHUBHADA, AN EXTRAORDINARY PERSON, READY TO CATCH THE SKY, COME WHAT MAY. SHE SHOULDERED VARIOUS RESPONSIBILITIES AND FACED MANY PROBLEMS, SEVERE LIKE THE SCORCHING HEAT OF THE SUN. YET, SHE EMERGED AS A CAPABLE PERSON. SHE CREATED HAPPINESS, BLISS AND CONTENT ALL AROUND HER WITH EXTREME DEDICATION. HER STRONG WILL AND CONTINUOUS STRUGGLE HELPED ACHIEVE BOUNTIFUL OF CHEERFULNESS, JOY AND GRATIFICATION FOR THE SATHE FAMILY. HER QUALITIES WERE SHINING LIKE NEVER BEFORE, ALL THANKS TO HER NONSTOP ENDURANCE. SHE WAS SEEN AS THE STRONG FOUNDATION AND ALSO THE STURDY PILLAR OF HER FAMILY, BALANCING THE SKY, WHILE SPREADING PROSPERITY, COMFORT AND SATISFACTION. THIS WAS ALL THAT SHE NEEDED AND WAS LOOKING FORWARD TO. HER LIFE-AIM WAS THUS ACHIEVED ONCE FOR ALL.
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आकाश झेलताना#मंजुश्री गोखले# #AKASH ZELTANA#MANJUSHREE GOKHALE#
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १७-११-१९

    एका समर्थ स्त्रीची कहाणी... मंजुश्री गोखले हे नाव एकल्याबरोबरच त्यांच्या विविध स्त्री-पुरुष संतांवरच्या कादंबऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय रसाळ आणि ओघवती शैली यामुळे त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर ्यांची नुकतीच ‘आकाश झेलताना’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मात्र ही कादंबरी संतावरची नाही, ती शुभदा या सर्वसामान्य कुटुंबातील, पण एका समर्थ नायिकेची कथा आहे. ज्याला जग सुंदर-सुखी करायचंय तो आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो, शुभदा या परंपरेतील आहे. जगताना येणाऱ्या संकटाना, आव्हानांना ती समर्थपणे सामोरी जाते. मात्र या संकटांची झळ ती आपल्या अवतीभोवतीच्या माणसांपर्यंत पोचू देत नाही, त्यांच्यापर्यंत ती सुखाची शीतल चांदणच पसरवते. जणू काही तीच तिची इतिकर्तव्यता होती. मराठी साहित्याला एक समर्थ नायिका दिल्याबद्दल लेखिकेचं कौतुकच करायला हवं. - रसिक भोळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा... आज स्त्रीच्या शिक्षणाला, महत्त्वाकांक्षांना आभाळ लाभलं आहे. भरपूर पैसा ती कमावत आहे. पण कुटुंब या संस्थेविषयी ती किती जागरूक आहे, हा कळीचा मुद्दा ठरावा अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरमंजुश्री गोखले यांनी एक गरीब घरातली. फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व या कादंबरीतून उलगडत जातं. शुभंदा एक सामान्य, गरीब घरातली, एका पायाचं किंचित अधू असलेली मुलगी, वय तिशीच्या आसपास, कोणतीच बाजू समर्थ नसल्यानं लग्न ठरत नसलेली. तिला कोकणातील एका बिजवराचे स्थळ येते. तिथून तिला होकार येतो आणि ती लग्न करते. तिचा नवरा डॉ. विद्याधर याचे मोठे कुटुंब. आई-वडील एक विधवा आत्या, दोन भाऊ, दोन बहिणी, पहिल्या विवाहाची दोन मुले, सगळे घर विस्कटलेले. एक भाऊ चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून जातो. एका बारबालेच्या प्रेमात पडतो. गुंडापासून पळून तिला घेऊन घरी येतो. दुसरा भाऊ गावातल्या एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात. शुभदा त्या दोन्ही भावांचे आयुष्य सुधारते. एक बहीण २७ वर्षांची. देखणी म्हणून प्रथम सगळी स्थळं नाकारून आणि आता लग्न होत नाही म्हणून कडवट बनलेली. धाकटी बहीण एका बांधकाम मजुराकडून फसवली जाणार असते. शुभदा तिला वाचवते. दोघींचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते. हे करत असताना पर्यटकांसाठी भक्त निवासाची सोय करते. व्यवसाय वाढवते. तीन भक्त निवास बांधते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पर्यटक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवते. सगळं घर सावरते. हे संकटांचं, अडचणीचं आकाश बुद्धीच्या जोरावर, आपल्या समर्थ खांद्यावर झेलते. कर्तव्यदक्ष पत्नी, वत्सल आई, प्रेमळ वहिनी अशी शुभदाची लोभस रूपं या कादंबरीतून समोर येतात. थर अशी ही शुभदाच्या कर्तृत्वाची गाथा आहे. ही कादंबरी वाचकांना योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, जोत्स्ना देवधर इ. कौटुंबिक आणि नायिकाप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांच्या काळात नेऊन सोडते. मांगल्य, शुचिता आणि सदाचार या आज दुर्मिळ झालेल्या गुणांचं दर्शन ही कादंबरी घडवते. कर्तृत्वाला प्रेमाची, समर्पणाची जोड असेल, तर त्या कर्तृत्वाला अर्थ लाभतो तसेच कर्तृत्वाला अपंगत्व किंवा सुमार रूप कुंपण घालू शकत नाही. असा संदेश देणारी ही कादंबरी आहे. मंजुश्री गोखले यांच्या ‘तुक्याची आवली’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘ओंकाराची रेख जना’, ‘ज्ञानसूर्याची सावली’, ‘हेचि दान देगा’ अशा संतचरित्रपर कादंबऱ्यांना पुरस्कार लाभले आहेत. तसेच वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ओघवत्या भाषेतील या कादंबरीलाही वाचकांचा असाच प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more