Yashodhara Katkar

About Author

Birth Date : 23/04/1954


YASHODHARA KATKAR HAS EMERGED AS A PROLIFIC WRITER IN THE POST-MODERNIST ERA OF MARATHI LITERATURE IN THE 21ST CENTURY .WITH A M.A. FROM UNIVERSITY OF MUMBAI AND PG DIPLOMA IN TOURISM MANAGEMENT, SHE MADE IT HER MISSION TO MENTOR STUDENTS THROUGH VOCATIONAL EDUCATION-TRAINING STREAM TO SET THEM ON CAREER PATHS IN TRAVEL, HOSPITALITY AND TOURISM INDUSTRY. WITH AN EYE FOR CONTEMPORARY ISSUES ,SHE CHOOSES TO WRITE ABOUT HUMAN STRUGGLES ,RELATIONSHIPS AND MOODS IN CURRENT TIMES .HER DIVERSE LITERARY WORKS INCLUDE A COLLECTION OF AUTIBIOGRAPHICAL ESSAYS ‘BANJARYACHE GHAR’ , PORTRAITS OF EMINENT PERSONALITIES CLOSE TO HER ‘ APOORVA ,ALAUKIK ,EKMEV’ , A COLLECTION OF SHORT STORIES ‘THIRD PERSON ‘ , ‘SWAYAM SHIKSHIT ,SWAYAM PRAKASHIT ‘ FOCUSSING ON RURAL WOMEN OF MARATHWADA AND ‘MOOLMANTRA CAREERECHA ‘ , OUTLINING VOCATIONAL/CAREER GUIDANCE FOR SCHOOL DROP-OUTS AND SSC /HSC STUDENTS . A VORACIOUS READER AND FILM BUFF, SHE CONTRIBUTES BOOK AND FILM REVIEWS AND IS CURRENTLY CONTRIBUTING ‘MANASKANYA BIMALDANCHYA ‘, FOR A LEADING MARATHI DAILY, BASED ON THE PORTRAYAL OF WOMEN IN THE FILMS MADE BY THE LEGENDARY PRODUCER –DIRECTOR, BIMAL ROY. A NOVEL FOCUSING ON THE UPS AND DOWNS IN THE INDIAN ART WORLD IS ALSO IN PROCESS. YASHODHARA IS THE RECIPIENT OF ‘SENIOR RESEARCH FELLOWSHIP ‘ BY CCRT ,MINISTRY OF CULTURE ,GOVT OF INDIA ,FOR 2017-19. SHE CHOSE THE TOPIC, ‘A STUDY OF MARATHI ‘NAVKATHA’ AND THE CONTRIBUTION OF AUTHOR ARVIND GOKHALE TO IT ’ , TO HIGHLIGHT THE HUGE CONTRIBUTION MADE BY GOKHALE AND CORRECT THE PERSPECTIVE ABOUT HIS RIGHTFUL PLACE IN THE HISTORY OF INDIAN LITERATURE . AMONG THE AWARDS AND ACCOLADES RECEIVED , ‘SWAMIKAAR RANJIT DESAI PURSKAR’ , ‘RAMSHETH THAKUR PURSKAR FOR THE BEST SHORT STORY WRITER OF THE YEAR ’ AND THE PRESTIGIOUS ‘BHAIRURATAN DAMANI PURASKAR’ ARE THE CLOSEST TO HER HEART .

समकालीन मराठी साहित्यातील आघाडीच्या लेखिका. मुंबई विद्यापीठातून एम.ए. आणि प्रवास-पर्यटन व्यवस्थापन विषयक पदव्युत्तर पदविका घेतल्यानंतर व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रात अध्यापक म्हणून दीर्घ काळ कार्यरत. त्यांनी नव्याने उदयाला येणाऱ्या या क्षेत्रात अध्यापन, त्या अनुषंगाने लेखन-समुपदेशन, व्यवस्थापन आणि जनसंपर्क अशा विविध उच्चपदस्थ जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिक्षण, साहित्य, कला आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांत अंगभूत रुची आणि अभ्यास असल्याने त्यांचे लेखनही त्या अनुषंगाने कथा, व्याQक्तचित्रणे, ललितबंध, चित्रपटविषयक लेख, करिअर मार्गदर्शनपर लेखन, मराठी विश्वकोशासाठी नोंदी आणि अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारांत बहरत गेलेले दिसते. त्यांच्या कथासाहित्यात महानगरी स्त्रीच्या जीवनातले ताणतणाव, भावच्छटा, एकाकीपण आणि तिची ससेहोलपट अशी वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमध्ये ‘बंजाऱ्याचे घर’ (आत्मकथनात्मक ललितबंध), ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ (व्यक्तिचित्रणे), ‘स्वयम शिक्षित, स्वयम प्रकाशित’ (मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या चळवळींच्या कहाण्या) आणि ‘मूलमंत्र करिअरचा’ (१०वी – १२वीच्या विद्याथ्र्यांसाठी मार्गदर्शन) तसेच ‘थर्ड पर्सन’ (कथासंग्रह) यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या २०१७-१९च्या ‘सीनिअर रिसर्च फेलोशिप’च्या मानकरी. ‘स्वामी’कार रणजित देसाई पुरस्कार’, ‘रामशेठ ठाकूर सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार’ आणि ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’ यांनी सन्मानित.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
APURVA, ALOUKIK, EKMEV Rating Star
Add To Cart INR 260
BANJARYACHE GHAR Rating Star
Add To Cart INR 190
KAMBAKTH NINDAR Rating Star
Add To Cart INR 250
THIRD PERSON Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more