Supriya Vakil

About Author

Birth Date : 12/04/1969


SUPRIYA VAKIL HAILS FROM KOLHAPUR, HOLDS DEGREES IN CIVIL ENGINEERING AND JOURNALISM AND MASS COMMUNICATION. SHE IS ACTIVELY INVOLVED IN THE THREE MEDIUMS OF RADIO, TELEVISION AND LITERATURE. SHE IS CURRENTLY WORKING IN THE FIELD OF INDEPENDENT WRITING AND TRANSLATION. SHE HAS WORKED AS A NEWS CORRESPONDENT FOR A LOCAL TELEVISION CHANNEL IN KOLHAPUR FOR 13 YEARS AND IS AN ACCLAIMED POETESS OF ALL INDIA RADIO. SHE IS ACTIVELY INVOLVED IN VARIOUS LITERARY AND CULTURAL ACTIVITIES. MAIFAL AND UTSAV ARE HER COLLECTIONS OF POETRY AND POPCORN IS HER COLLECTION OF PROSE. HIS MARATHI TRANSLATION OF ENGLISH LITERARY WORKS BY INDIAN AND FOREIGN AUTHORS HAVE BEEN PUBLISHED. (INCLUDING LITERATURE BY HILLARY CLINTON, ARUN SHOURIE, JRD TATA, DR. APJ ABDUL KALAM, KIRAN BEDI, KHUSHWANT SINGH, TASLIMA NASREEN, CHETAN BHAGAT, ETC.) SHE HAS RECEIVED GOVERNMENT OF MAHARASHTRA BEST LITERARY AWARD, SWAMI KAR RANJIT DESAI BEST TRANSLATION AWARD, APTE READING MANDIR, ICHALKARANJIS BEST TRANSLATED LITERARY AWARD, TUKA MHANE AWARD, ASHIRWAD AWARD, SPECIAL AWARD FROM DAKSHIN MAHARASHTRA SAHITYA PARISHAD. SHE HAS BEEN HONORED WITH MANY AWARDS LIKE YUVA GAURAV PURASKAR, PATRAKAR PURASKAR AND MUKTAI PRAKASHAN (KOLHAPUR) SAI SAMRADNNI PURASKAR 2018.

कोल्हापूर येथे वास्तव्य असलेल्या सुप्रिया वकील यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग व वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका प्राप्त केल्या आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी व साहित्य या तिन्ही माध्यमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या त्या स्वतंत्र लेखन व अनुवाद या क्षेत्रांत कार्यरत आहेत.कोल्हापुरातील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदिक म्हणून १३ वर्षे काम केले तसेच त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मैफल व उत्सव हे काव्यसंग्रह आणि पॉपकॉर्न या ललितगद्य संग्रहासह त्यांचे भारतीय व परदेशी लेखकांच्या इंग्रजी साहित्यकृतींचे मराठी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. (ज्यामध्ये हिलरी क्लिंटन, अरुण शौरी, जेआरडी टाटा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, किरण बेदी, खुशवंतसिंग, तसलिमा नसरीन, चेतन भगत इत्यादी मान्यवरांच्या साहित्याचा समावेश आहे.)महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, स्वामी कार रणजित देसाई उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा विशेष पुरस्कार. युवा गौरव पुरस्कार, पत्रकार पुरस्कार व मुक्ताई प्रकाशनातर्फे (कोल्हापूर) सई सम्राज्ञी पुरस्कार 2018 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 42 total
ADAMYA JIDDA Rating Star
Add To Cart INR 250
ANUP Rating Star
Add To Cart INR 250
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120
BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION Rating Star
Add To Cart INR 150
25 %
OFF
CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 720 INR 540
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 1 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL Rating Star
Add To Cart INR 200
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL Rating Star
Add To Cart INR 195
CURED Rating Star
Add To Cart INR 595
CUTTING FREE Rating Star
Add To Cart INR 260
DESIGN YOUR CAREER Rating Star
Add To Cart INR 130
1234

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more