Leena Sohoni

About Author

Birth Date : 08/09/1959


LEENA SOHONI IS A PROLIFIC WRITER AND A TRANSLATOR AND HAS BEEN CLOSELY ASSOCIATED WITH MEHTA PUBLISHING HOUSE FOR OVER 33 YEARS. SHE HAS TRANSLATED OVER FIFTY FIVE BOOKS INTO MARATHI INCLUDING THE MUCH TALKED ABOUT LAJJA, BY BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN. APART FROM TRANSLATION LEENA ALSO WRITES IN PERIODICALS, DAILIES AND ON DIGITAL PLATFORMS IN ENGLISH AND MARATHI. LEENA COMPLETED HER MASTERS IN GERMAN FROM PUNE UNIVERSITY IN THE YEAR 1981 AND WAS AWARDED CHANCELLOR’S GOLD MEDAL FOR SECURING THE HIGHEST RANK IN THE ARTS FACULTY. LEENA IS A RECEIPIENT OF NUMEROUS LITERARY AWARDS INCLUDING THE STATE GOVERNMENT AWARD FOR BEST TRANSLATION (FOR HER TRANSLATIONS: LAJJA BY TASLIMA NASREEN AND WISE AND OTHERWISE BY SUDHA MURTY), G.A.KULKARNI AWARD, N.C.KELKAR AWARD, BAL SHATRI JAMBHEKAR AWARD AND RANJIT DESAI AWARD TO NAME A FEW. SHE HAS ATTENDED ADVANCED TEACHERS’ TRAINING COURSES IN GERMANY ON SCHOLARSHIPS, ONCE BY THE GOETHE INSTITUTE AND ONCE BY THE CULTURAL MINISTRY OF GERMANY.

लीना सोहोनी यांनी १९८१ साली पुणे विद्यापीठातून जर्मन विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली. त्यावर्षी कलाशाखेत सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना चॅन्सेलर्स सुवर्णपदक प्राप्त झाले. मुंबईच्या मॅक्स म्युलर भवनतर्फे २००३मध्ये आणि जर्मनीच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे २००९मध्ये जर्मन विषयाच्या अध्यापन प्रशिक्षणासाठी संपूर्ण आशिया खंडातून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी कोल्हापूरमधील विवेकानंद महाविद्यालयात जर्मन विषयाचे अध्यापक म्हणून काम केले असून सध्या त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. अनुवाद व लेखन यांमध्ये विशेष रुची असलेल्या लीना सोहोनी यांची मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे अनेक अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सन्मान व पुरस्कार – राज्यशासनाचे सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यासाठीचे पुरस्कार : लज्जा , लेखिका : तस्लिमा नासरिन,(१९९४-९५), वाइज अँड अदरवाइज , लेखिका : सुधा मूर्ती (२००३-०४) इतर – स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार (२००१), साहित्यभूषण पुरस्कार , वुमन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अ‍ॅन्ड पब्लिक वेल्फेअर फौंडेशन, कोल्हापूर (२००८), त्याचवर्षी सहाव्या गोमंतक महिला साहित्य संमेलना चे अध्यक्षपद भूषविले. आपटे वाचन मंदिर यांचा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्याचा पुरस्कार (२००८-०९), द गोवा हिंदू असोसिएशन तर्फे जी.ए. कुलकर्णी पुरस्कार , (२००९), आंतरभारती संस्थेतर्फे बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (२०११)
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 59 total
A PRISONER OF BIRTH Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
A QUIVER FULL OF ARROWS Rating Star
Add To Cart INR 250
TBC Classic Book
A TWIST IN THE TALE Rating Star
Add To Cart INR 300
TBC Classic Book
AAJI AAJOBANCHYA POTADITALYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 280
AAJICHYA POTADITALYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 200
ADWAIT Rating Star
Add To Cart INR 350
AKHADA Rating Star
Add To Cart INR 220
AMARGEET : BABA AMTE YANCHA JEEVANCH... Rating Star
Add To Cart INR 250
ANUWADATUN ANUSARJANAKADE Rating Star
Add To Cart INR 370
AYUSHYACHE DHADE GIRAVTANA Rating Star
Add To Cart INR 200
BAKULA Rating Star
Add To Cart INR 180
BE CAREFUL WHAT YOU WISH FOR - CLIF... Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
12345

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more