Kanchan Ghanekar

About Author

Birth Date : 16/09/1947


MRS. KANCHAN KASHINATH GHANEKAR IS THE DAUGHTER OF VETERAN FILM ACTRESS SULOCHANA AND WIFE OF FILM AND THEATER ACTOR KASHINATH GHANEKAR. HE WAS BORN ON 16 SEPTEMBER 1947. HE DID HIS BA IN MARATHI AND PHILOSOPHY FROM MUMBAI UNIVERSITY. DEGREE AND M.A. FROM THE SAME UNIVERSITY. THIS DEGREE WAS ACQUIRED WITH THE SUBJECTS OF MARATHI AND LINGUISTICS.

श्रीमती कांचन काशिनाथ घाणेकर या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुलोचना यांची कन्या आणि सिने-नाट्य अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर१९४७ रोजी झाला. त्यांनी मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठातून एम.ए. ही पदवी मराठी व भाषाशास्त्र या विषयांसह संपादन केली. १९६९ पासून विविध वृत्तपत्रांतून, सिनेसाप्ताहिकांतून आणि दिवाळी अंकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नाथ हा माझा या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या त्यांच्या चरित्रग्रंथाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स तर्पेÂ केल्या गेलेल्या दशकातील १०१ मराठी पुस्तकांच्या यादीत चरित्र विभागात या पुस्तकाची नोंद झाली आहे. भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुलोचना, राजा परांजपे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील १५ दिग्गजांवरील व्यक्तिचित्रांवर आधारित रेशीमगाठी हा लेखसंग्रहही मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला असून, त्याच्याही तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीवर आधारित आठवणींचं पुस्तक माझी माणसं याचं लेखन सध्या त्या करत आहेत. नाट्यविषयक लोकप्रिय ग्रंथ गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती विश्वस्त प्रतिष्ठानच्या त्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेकरीता, म.टा. सन्मान - महाराष्ट्रतर्फे आयोजित स्पर्धेकरीता (चित्रपट विभागासाठी), महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाकरीता, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी दोनदा आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
24 %
OFF
KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 565 INR 429
NATH HA MAZA Rating Star
Add To Cart INR 395
RESHIMGATHI Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more