बिझिनेस लेजंड्स
जीवंतपणीच "आख्यायिका' ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींची वेधक शब्दचित्रे
अनुवादक : अशोक जैन डॉ.
मूळ लेखक : गीता पिरामल
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच "आख्यायिका' ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे.
ही या चार उद्योगमहषी|ची व्यक्तिचित्रं आहेत.
त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्याचंी वौचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे "संधी'त रूपांतर करण्याचे त्यांचे सामध्र्य किती प्रचंड होते, वौयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चौतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे.
त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे.
लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल.